Wednesday, April 22, 2015

प्रसन्न जोशी  ह्यांनी कोसला संदर्भात विचारलेल्या  कोसलाने व तश्या कादंबऱ्यानी दलित नायकाची वाट  अडवून धरली का  ह्या  प्रश्नाचे उत्तर 
श्रीधर तिळवे 

प्रसन्नजी प्रथम आभार मानतो . दलितांचा पहिला नायक खुद्द आंबेडकरच होते साहित्यात विशेषत : महाकृतीत त्या लेवलचा नायक अजूनही दलित कादम्बरीकारांना जन्माला घालता आलेला नाही . त्यामुळे कोसलापूर्वी महान  दलित कादम्बरी म्हणावी अशी दिसत नाही कोसला आधीच आली त्यामुळे कोसलाने दलित नायक संपवला वा अडवून धरला असे म्हणता येणार नाही वास्तविक अण्णाभाऊ साठेंनी पार्श्वभूमी निर्माण केली होती . बाबुराव बागुलांच्या कथांनीही ही पार्श्वभूमी पुढे न्हेली होती पण त्यातून नवा नायक अवतरला तो आत्मचरित्रात्मक ! दगडू पवार पासून ! नेमाडेंच्या नायकाने न्हवे तर नेमाडेंच्या देशीवादाने दलित नायक अडवून ठेवला गावगाड्यात पाणी अडवावे तसा ! ह्यातच भर म्हणून नेमाडेंच्यात झालेला बदल ढसाळांच्या पुरेसा लक्ष्यात आला नाही त्यामुळे पाणी अडलंय कुठे हेच कळले नाही . नेमाडेंनी जातीच्या आडव्या अक्षाचा पुरस्कार केला तरी हे लोक नेमाडेंना पाठींबा देत राहिले . आडव्या अक्षात उच्च निच्च गेले तरी जन्मजात व्यवसाय तसाच राहतो हे आजही अनेक दलितांच्या लक्ष्यात येत नाहीये मी ह्यावर ''आत्मचरित्रातले  काल्पनिक क्षण '' ह्या काव्य -कादम्बरीत दीर्घ लिहिले आहे . पण लक्षात कोण घेतो ? पुढे ओबीसी फुलेवादी समूह जागा झाला त्यातून नवा सुशिक्षित ओबीसी लेखक उदयाला आले आणि त्यांना नेमाडेंच्यात नायक दिसला ह्याला आनंद यादवांचा वैचारिक भोंगळपणा जबाबदार होता आज शेतकरी वर्गाची अवस्था गोतावळ्याशी जास्त जुळते कोसला व नेमाडे ह्यांच्या इतर  कादंबऱ्याशी नाही तरीही यादव सत्यकथेच्या stamp मुळे मागे पडले दुसरी गोष्ट शेतकरी लेखकांनाही आता शेतकरी रहावयाचे न्हवते तर नेमाडेंच्या प्रमाणे चकाचक नोकरी करून प्रतिष्ठा कमवायची होती त्यातच नेमाडेंनी उघडपणाने फुलेवादी भूमिका स्वीकारली आनंद  यादवां च्या समरसता मंचापेक्षा ही भूमिका कणखर होती त्यामुळे नेमाडे हे ओबीसी समुहाचे आदर्श नायक बनले दोघेही अंतिमत : हिंदुत्वात जाऊन उडी मारणार आहेत हे कुणाच्याच लक्षात आले नाही कुणबी वर्गाला शहाण्णव कुळी बन ण्याचे जे वेध लागले होते /आहे त्याचे हे साहित्यिक प्रतिबिंब होते /आहे . ह्या सगळ्या प्रक्रियेत ज्या दलितांना नवा नायक निर्माण करायचा होता त्यांची फारच कुचम्ब् ना झाली .सामाजिक पातळीवर दलितांचे गावात क्षत्रिय आणि ओबीसी समूहाशी संघर्ष सुरु झाले गावात ब्राह्मण नसल्याने ब्राह्मणांना शिव्या तरी कशा घालणार आणि किती घालणार शिवाय शहरात ओबीसी आणि दलित दोघेही समान-संघर्षी त्यामुळे कोसलाशी नाते जुळते आणि व्यापक पातळीवर जुळत ही नाही असा तिढा निर्माण झाला वास्तविक लेखक नेमाडेंना सलाम आणि देशीवादी नेमाडेंना टाटा आणि गुडबाय अशीच भूमिका सर्व दलित लेखकांनी घ्यायला हवी होती पण ती न घेतल्याने पांडुरंग सांगवीकर नेमका का आवडतो ह्याची मीमांसा झालीच नाही . ज्यांना मृत्युंजय स्वामी आवडते त्यांनाच कोसलाही आवडते हे ढळढळीत सत्य अनेकांना दिसले नाही . पांडुरंग सांगवीकर बाबासाहेबांच्या शहरात चला ह्या संदेश्याच्या विपरीत आधुनिकतेला घाबरून गावात परततो त्यामुळे आपल्याला ज्यांना शहरातील आधुनिकता अवगत करून नवे जग निर्माण करायचे आहे त्यांना पांडुरंग सांगवीकर काही कामाचा नाही हेच अनेक दलित लेखकांच्या लक्षात आले नाही माझ्या अडाहव्का बानासुना ह्या कादंबरीबाबत एकाची तक्रार काय तर तुझा नायक फारच कृत्या करतो . म्हणजे पांडुरंग सांगवीकरासारखी मनातल्या मनात मांडे खाल्ले कि तो थोर मराठी नायक ! शेवटी परंपरेच्या खुंटावर मुकाट येवून बसला कि तो थोर मराठी नायक !  ह्या नायकाला व त्याच्या पराभवाला  देशीवादाने परंपरेचे मखमली म्यान पुरवले परिणामी सर्वत्र कोसलाच कोसला नेमाडेच नेमाडे ! मग भुरटे नेमाडे प्रतीनेमाडे !
थो ड क्या त काय तर कोसलाने न्हवे   कोसलाला नंतर जे देशीवादी आवरण चढले त्या  देशिवादाच्या आवरणाने दलित नायकाची वाट अडवून धरली . मराठी साहित्याला एक कोसला आवश्यक होती देशिवादाने तिचा   नेमाड  पंथ बनवला आणि ह्या पंथाने अनेक दलित लेखकांना आंधळे केले .
श्रीधर तिळवे 

No comments: