Sunday, August 29, 2021

मितभाषी श्रीधर तिळवे नाईक 

जयंत पवार गेला अत्यंत कमी पण नेहमी खरं बोलणारा मितभाषी आणि सोशिक जयंत गेला आमच्या शेवटच्या भेटीत आम्ही फक्त एकमेकांच्या आजारावर बोललो होतो आणि हम होंगे कामयाब ची हिडन धून आळवत वेगळे झालो होतो 

जयंत लालबाग परळच्या मिल कामगारांच्यात जन्मला वाढला साहजिकच त्याची मानसिकता पूर्ण अरबन कधीच झाली नाही मी ह्या ठिकाणी काही महिने राहिलो होतो त्यामुळे एकंदर जयंत काय वातावरणात वाढला असेल ह्याचा मला अंदाज होता  त्याने मुंबई डोक्यावर ठेवली पण लालबाग परळ काळजात ! सुरवातीला चौथ्या नवतेच्या पूर्ण विरोधात आणि नंतर बाजूने असा आमचा नातेप्रवास होता 

त्याचे पहिले नाटक फुल मेलोड्रॅमॅटिक पण दुसरे अंधांतर त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा तुकडा सादर करणारे जणू वास्तवाची एक स्लाइस कापून रंगमंचावर ठेवलेली ! त्याच्या एकांकिकाही अशाच ! 

त्याला सिनेसृष्टीत लेखक दिग्दर्शक व्हायचे होते पण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ! त्यातील सिनेलेखक तो झाला ब्रेकिंग न्यूज ह्या फिल्ममुळे पण बॉलिवूडमधील सारा खेळ हिट फ्लॉपचा फिल्म फ्लॉप झाली आणि रोध निर्माण झाला सज्जनता ही बॉलिवूडमध्ये डीसक्वालिफिकेशन आहे ह्याविषयी आमच्यात सहमती होती 

त्याचे कथालेखन हे मराठीत फार महत्वाचे ! खरेतर मी त्यावर सविस्तर लिहिणार होतो किंबहुना ऐंशोत्तरी  पिढीचे कथालेखन हा एक प्रबंधाचा विषय आहे असं माझं मत आहे कथालेखनाची एव्हढी विविधता दाखवणारी पिढी ही फक्त गाडगीळ माडगूळकर प्रभाकर पाध्ये गोखले ह्यांच्या काळात होती जयंत हा आमच्या पिढीचा एक बिनीचा कथालेखक होता सुदैवाने साहित्य अकादमी मिळाल्याने त्याची दखलही घेतली गेली 

आणि आता तो गेला तो एक हरणारी लढाई लढतोय असं वाटत होतं . शेवटी हरला !

कमी शब्दात अस्तित्व दरवळत ठेवणारा एक मोठा लेखक गेला . अलविदा दोस्त !

श्रीधर तिळवे नाईक 

गतवर्षाचा धडा श्रीधर तिळवे नाईक 

एप्रिल २०२० ते मे २०२१ हा कालखंड कलात्मक पातळीवर फार विचित्र गेला १ कोव्हीड २ विषघटना आणि ३ आईचा मृत्यू अशा लागोपाठच्या घटनांनी वर्ष वेगवान केले आणि कवितेत त्यांची अभिव्यक्तीही झाली कवितेत वर्तमान ओतण्याची माझी कलाशैली आहे त्यातून कोव्हीडवर महाकाव्य विषघटनेवर बृहदकाव्य आणि आईच्या मृत्यूवर खंडकाव्य अशी तीन काव्ये झाली ह्यापूर्वी एकाच वर्षात तीन प्रकारची मोठी काव्ये कधी झाली न्हवती ती ह्यावर्षी झाली 

विचित्र गोष्ट अशी कि ह्या वर्तमानकालीन कविता फेसबुकवर टाकत असतांना डेकॅथलॉन एल्सट्रातल्या १९८३ -१९८७ ह्या दरम्यानच्या कविता मी टाकत होतो तर त्या काहींना आत्ताच्या काळाला रिलेव्हन्ट वाटायला लागल्या वास्तविक राजीव गांधींचा कालखंड आणि मोदींचा कालखंड ह्यांच्यात फरक आहे हा फरक टिपणाऱ्या राजकीय कविता फारश्या लिहिल्या जात नाहीयेत लोक अजूनही आधुनिक किंवा साठोत्तरी कवींच्या संवेदनशीलतेनं हा कालखंड बघतायत त्यातूनच जुन्या कविता वर्तमानकालीन वाटतायत राजीव गांधी आणि नरसिंहराव ह्यांनी ज्या कार्पोरेट जगताला वसवायला सुरवात केलीये ते मोदींनी पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेलं आहे अगदी भाजपसारखा राजकीय पक्ष ही कार्पोरेट म्हणून सेटल झालाय भाजप हे कार्पोरेट प्लेयर म्हणून पोलिटिकल फ़ंक्शनिंग करतंय त्याच्या सत्ताकारणाचे अनेक लोचे आहेत आपण आता ते पकडतो आहोत का ? आमच्या पिढीची संवेदनशीलता आता पुरेशी नाहीये आणि साठोत्तरी संवेदनशीलता तर पूर्ण आऊटडेटेड आहे शारीरिक तारुण्यता जर जीर्ण वृद्ध संवेदनशीलतेनं काम करणार असेल तर तिला दाद काय देणार ? जगभर देशीवाद आणि उत्तराधुनिकवाद सर्वच वर्तमानाला जखडून टाकतो आहे मराठी कला ह्याला अपवाद नाहीत खरेतर सार्वजनिक जीवनात धर्माचा वाढलेला हस्तक्षेप हा नेमका कशाचा द्योतक आहे ? आधुनिक शासनयंत्रणेचं डेड फ़ंक्शनिंग ह्याला जबाबदार आहे उत्तराधुनिक शासनयंत्रणा तर मुलखाच्या वाचाळ निघाल्या आहेत घटलेल्या कार्यक्षमता नीट ऍक्टिव्हेट करण्याऐवजी कार्पोरेट जगताने धार्मिक राजवटी स्पॉन्सर करण्याचा जो मूर्ख उत्तराधुनिक खेळ रचला त्याने सर्वत्र हा अनाचाराचा हाहाकार माजवला आहे तालिबान ह्या हाहाकाराचे एक मूर्ख स्वरूप आहे ते राज्य करता न आल्याने कोसळेलंच पण अफगाण जनतेची त्यात आणखी वीस वर्षे वाया जातील ह्याचं वाईट वाटतं धार्मिक राजवटींनी कितीही आव आणला तरी त्यांना नवीन जगतासाठी आवश्यक शासनयंत्रणा उभा करता येणं शक्य नाही त्यांना एकतर आपलं तत्वज्ञान त्यागावं लागेल किंवा स्वतःच्या कर्माने नष्ट व्हावे लागेल शेवटी लोक एक आल्टरनेटिव्ह म्हणून त्यांच्याकडे बघतायत तो नीट फंक्शन झाला तर लोक हा पर्याय टिकवतील नाहीतर फेकतील औरंगजेबाची राजवट अशीच आतल्या फोफशेपणामुळं कोसळली होती मराठ्यांनी फक्त तिला ठोसे मारणे पुरेसं ठरलं 

कॅव्हिडनं आपल्या सर्वच शासनयंत्रणा ह्यात युरोपियन अमेरिकन शासनयंत्रणाही आल्या उघड्या पाडल्या प्रश्न त्या बदलायच्या कशा हा आहे 

पर्यावरणीय हाराकिरी ह्या वर्षी केंद्रस्थानी आली खरी पण ती फक्त चर्चेत राहिली 

 पैसा बिनडोक असतो त्याला नजीकचे स्वार्थ दिसतात पण भविष्यातले विनाश दिसत नाहीत मानवी जीवन पैशाच्या हाती सोपवणे ही आत्महत्या होती आणि ही आत्महत्या पूर्णत्वास पोहचली आहे . प्रश्न आहे अर्थधनशैली हा मानवी जीवनशैलीचा मुख्य आधार म्हणून फेल गेली असेल तर पर्याय काय ?


श्रीधर तिळवे नाईक