Thursday, February 26, 2015

मी 
मूळात '' मी '' हाच काल्पनिक त्यातून मी अमुक अमुक जातीचा हे महाकाल्पनिक लोकांना जगायला कल्पना लागतात हि खरी शोकांतिका ! बघू आणखी किती शतके लोक ह्या FANTACY त वाया घालवतात . 

Friday, February 20, 2015

शेवटी पानसरे गेले

शेवटी पानसरे गेले. दुसऱ्याच्या मूर्खतेने त्यांना मृत्यू दिला . विचारप्रणालीचा अस्त होत असताना ज्यांना विचारप्रणाली नष्ट होणार नाही असे भय वाटते आणि ज्यांना अजूनही विचारप्रणाली लोकांचे लढे लढवू शकते ह्याचे भय वाटते अश्या भ्याड लोकांचा हा हल्ला असेल तर त्याहून लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी नाही .
मी स्वतः कम्युनिझमच्या विरोधात होतो आणि आहे पण कॉम्रेड स विषयी मला प्रेम आहे . परिवर्तनाची लढाई पारंपारिक मार्गांनी लढायचे दिवस इतिहासजमा झालेत आणि कम्युनिझम हा ऑ उट डेटेड झालाय हे मला मान्यच आहे पण हे मतभेद अहिंसक मार्गांनी टेबलावर बसून सोडवता येतात त्यासाठी हत्या करणे हे अक्कल रसातळाला गेल्याचे लक्षण आहे . समजा तुमच्या हितसंबंधाच्या आड एखादा   माणूस येत असेल तर निवडणुकीत त्याला हरवा वा त्याच्याशी वाद घाला . आणि हे न  करता तुम्ही एका चांगल्या माणसाची हत्या करत असाल तर तुम्ही हलकट व नीच प्रवृतीचे आहात असेच म्हंटले पाहिजे . ह्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत सर्व निर्णय अहिंसात्मक मार्गानेच घेतले गेले पाहिजेत . टेबलावर प्रश्न सुटत नसेल तर कोर्ट आहेच . तिथे अपील  करू शकता . आणि परिवर्तनवा द्यांच्यात दहशत पसरवणे हा तुमचा हेतू असेल तर तो सा ध्य
होणे कठीण आहे . उलट आता तो जोमाने फैलावेल . रक्त फक्त दहशत पसरवत नाही ते त्या मृत माणसाचा विचारही पसरवते .
तेव्हा हे हल्ले थांबवा , हा मूर्खपणा आहे
पानसरे सर , तुम्ही आता नाही आहात हि गोष्ट व्याकुळ करणारी आहे,शरद पाटील आणि तुम्ही खरा शिवाजी लोकापर्यंत आणलात . कोल्हापूरचे तुमचे आकलन हे द्रष्टेपणाचे होते . तुम्ही गेलात तरी तुमच्या लढवय्ये पणाच्या कथा आणि वारसा सोबत राहीलच .
श्रीधर तिळवे 

Monday, February 16, 2015

गोविंद पानसरे ह्यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध 
कॉम्ऱेड गोविंद पानसरे ह्या अजातशत्रू माणसावर हल्ला व्हावा ह्याहून दु:खद गोष्ट ती काय ? पानसरे आणि मी एकाच गल्लीतील रहिवासी . मी लहानपणापासून त्यांना पाहतोय . माणुसकीचा  निखळ झरा आहे हा माणूस ! त्याच्यावर हल्ला ? कुणाची डोकी अशी फिरलेत आणि कोणी ती फिरवलेत ?हिंसक विरोध करून विचार संपवता येतात अशी महामूर्ख गैरसमजूत कुणाची झालीये ? मी ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो  आणि त्यांच्या विरोधकांना लवकरात लवकर सद्बुद्धी सुचेल अशी अशा करतो . 

श्रीधर तिळवे 

Friday, February 13, 2015

His collection of stories titled AMERIKECHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT is published by NAVTA PRAKASHAN in 2011. Stories are related with emergency, Bhopal gas tragedy, an arrival of Bill Clinton, death of science and reaction of nastik, Mahatma Basweshwar, existential miracles, love story under the shadow of dalit-election politics, twin tower attack and imaginary death of poet and his last day experience.

Wednesday, February 11, 2015

आउटडेटेड नेमाडे आणि प्रतीसृष्टीय कादंबरीचा मृत्यू 
 श्रीधर तिळवे 
                                     1
कलाकृतीचे वर्गीकरण हे समीक्षेतील एक आवश्यक पाप आहे . सर्व  साधारण पणे आकारानुसार (sizeनुसार ) कलाकृतींचे  चार प्रकार होतात.

१ महाकृती
२ बृहदकृती
३ दीर्घकृती
४ लघुकृती
विश्वीय कालखंडात महाकाव्य, बृहद्काव्य, दीर्घकाव्य,  लघुकाव्य असे चार प्रकार उदयास आले .महाकाव्य हा महाकृतीचा  विश्वीय  आकार होता रामायण आणि महाभारत ही जगातील दोन श्रेष्ठ महाकाव्ये इंडियiने दिली

सृष्टीयतेत  scientific revolution  नंतर  गद्याचा व वास्तव आकलनाचा प्रभाव वाढत गेला. गटेनबर्गने चायनीज तंत्र अधिक विकसित करून छापील  संस्कृती आणली आणि महाकृतीत पद्याचा वापर करण्याची गरज संपली त्यातून आधुनिक कादंबरी स्थिरावली सौंदर्य वाद आणि वास्तववाद ही तिची साहित्यिक ideology होती

 ह्या आधुनिक कादंबरी विरुद्ध उभी टाकली ती  प्रतिसृष्टीय आधुनिकतावादी  कादंबरी ! नवकादंबरी आणि प्रतिकादम्बरी हे त्यांचे स्वरूप होते . रणांगण ह्या विश्रiम  बेडेकर ह्यांच्या  कादम्बरीने नवकादंबरीची सुरवात केली असली तरी ती परिपूर्ण नवकादंबरी नव्हती . नेमाडे ह्यांचे योगदान इथून सुरु होते . ''कोसला'' ही मराठीतील पहिली परिपूर्ण नवकादंबरी आहे परिपूर्ण नवकादंबरी ही आधुनिक विरुद्ध उभी ठाकते. कोसला
ही
१ पुणे हे आधुनिक शहर
२ इतिहास हा ideology चा कणा
३ आधुनिक शिक्षण
४ आधुनिकतील ठोंबेपणा
५ पोलिस ही आधुनिक राज्याची सत्ता दर्शवणारी संस्था
६ पैसे व पैसेवाला शेतकरी बाप
ह्या सर्वाविरुद्ध उभी ठाकते . scientific rationalism ने बधीर केलेली भावनिक संवेदनशीलता नाकारून अत्यंत उत्कट संवेदन शीलता अपनवते . पांडुरंग बहीणीच्या मृत्यूने पिसाटून जातो कारण घरच्या लोकांची बधीरता त्याला सहन होत नाही . हा romanticism नाही ही sensibility आहे .
पण
 हा पण महत्वाचा आहे . pandurang त्या प्रश्नांचा सामना करत नाही तो चक्क पळून गावात येतो . कृषीय आधुनिक स्वीकारतो खुंट्या वर बसतो पांडुरंग  औध्यो गिक होत नाही . प्रतिसृष्टिय औध्योगिकतेला नाकारत तो परंपरेत दाखल होतो . घरी रग्गड पैसा असल्याने हा देशीवाद त्याला परवडतो किंबुहना परंपरा वैगरे टिकवणे ह्या चैनी गरीबाला कुठे परवडायच्या 

ह्याचा जो परिणाम होण्याची शक्यता होती तीच झाली . नेमाडे कायमचे मागे परतले . ज्या आधुनिक शिक्षण संस्थेविरुद्ध ते कोसलात उभे ठाकले तिथेच शिकवू लागलेमात्र इथेही नेमाडे अस्सलच राहिले . ते जिथे होते ती एक आधुनिक संस्था होती तिचे ते चाकर होते ते प्रामाणिकपणे शिकवू लागले नेमाडे ह्यांचा हा अस्सल प्रामाणिकपणा हा त्यांच्या केवळ व्यक्तिमत्वाचाच नव्हे तर त्यांच्या साहित्याचाच विशेष आहे. त्यांनी ओळखले कि आपण कोसलात घेतलेली उडी इथे कामाची नाही ज्या सृष्टीय वास्तववादाविरुद्ध त्यानी स्वःता बंड केले त्या वास्तववादाला ते जाऊन मिळाले. हे पलायन नव्हते हे भारतीय वास्तवाचे नागडे आकलन होते . मुख्य सेनापतीनेच मशीनगन टाकून तलवार उचलल्यावर जी अवस्था होते तीच मराठी  साहित्यीकाची झाली . जो तो तलवारीने वास्तव लिहू लागला ह्याचा एक फायदा असा झाला की मराठी साहित्यातील भुरटा वास्तववाद ,शब्दबंबाळ प्रतीमावाद आणि फोफ्सा सौंदर्य वाद जाऊन त्या जागी अस्सल वास्तव आले . ह्या परिवर्तनात  दलित साहित्याचा वाटा अधिक असला तरी बिढार जरीला झूल ह्या तिन्ही कादंबऱ्याचा ह्यात मोलाचा हातभार होता .
पण ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला की साहित्यात ideology महत्वाची ठरू लागली . कोण कुठल्या ideology चा समर्थक आहे ते महत्वाचे झाले आणि लेखनाची गुणवत्ता पाहणे दुय्यम महत्वाचे झाले ह्याचा एक दुष्परीणाम असा झाला कि मराठीत वास्तववादाचे दळण सुरु झाले ह्या दळणाने प्रतीसृष्टीयकादम्बरीचा प्राण काढून घेतला आणि मराठी साहित्यात प्रतीसृष्टीय कादम्बरी मृत्यू पावली . 
                            2
नेमाडे ह्यांनी वास्तववादी कादम्बऱ्या लिहल्या खऱ्या पण त्या लिह्ण्यामागील साहित्यबाह्य कारण तेही वास्तववादाच्या पलीकडील देणे त्यांना गरजेचे होते कारण त्यांच्या वास्तववादापेक्षा सशक्त वास्तववाद आंबेडकरी विचारप्रणाली मधून आलेले बाबुराव बागुल आणि इतर दलित साहित्यिक सादर करत होते . दया पवार ह्यांच्या '' बलुत '' ह्या आत्मकथनाने तर नेमाडे ह्यांचा वास्तववादही किती पातळ आहे ते दाखवून दिले नंतरच्या दलित आत्मकथनानी भारतीय साहित्याचा चेहरामोहराच  बदलून टाकला . 
ह्या पार्श्वभूमीवर नेमाडे ह्यांना स्वत:च्या वास्तववादाची नवी ओळख निर्माण करणे गरजेचे बनले.अशावेळी आंबेडकरांच्या विचारप्रणालीला शह देणारा एकच विचारवंत नेमाडेच्या कामाला येवू शकत होता तो म्हणजे महात्मा गांधी ! देशिवादाची पहिली अस्सल मांडणी ही  गांधीनी केली होती विदेशी संस्कृतीचा व वसाहतवादाचा प्रभाव रोखणे हे गांधी ह्यांचे सांस्कृतिक धोरण होते पुढे लोहिया ह्यांनी हा देशीवाद समाजवादाच्या अंगाने पुढे न्हेला जयप्रकाश नारायण ह्यांनी तो इंदिरा गांधी ह्यांना नामोहरण करण्यासाठी वापरला राजकीय पातळीवर यशस्वी झालेला हा समाजवादी देशीवाद एकाच वेळी आंबेडकरवादाला शह देत होता आणि वसाहतवादाला विरोधही करत होता. ह्यातूनच कोकाकोलाला हाकलून देणे वगैरे प्रकार झाले . त्यातूनच ब्राह्मणेतरांना देशीवाद देत देत दलितांना वेगळ्या पद्धतीने गोन्जारण्याचे धोरण अवलंबले गेले. सृष्टीयतेला आवश्यक अशी विचारप्रणाली देशीवादाच्या रूपाने नेमाडे ह्यांना मिळाली आणि १९८३-४ साली ती अधिकृतरीत्या सादर करण्यात आली . तिने आंबेडकरवादाला शह आणि मात दिलीच पण नेमाडे ह्यांचे कोसलाने निर्माण केलेले नायकत्व अबाधित राखले . माघार घेवूनही कशी सत्ता सोडायची नाही आणि नायकत्वही कसे अबाधित राखायचे हे कॉंग्रेसने समस्त क्षत्रियांना शिकवले होतेच नेमाडे ह्यांनी ही शिकवणी कला क्षेत्रात गिरवली . आश्चर्यकारक रीतीने खुद्द दलित साहित्यिक नेमाडे ह्यांची भलावण करू लागले आणि त्यांनीही साहित्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याऱ्या रिपब्लिक पार्टीचे धोरण स्वीकारले . ही irony होती पण तिने देशीवादाचा विजयरथ दलित वस्तीतही फिरवला आणि मंगेश बनसोड सारखे आमचे मित्रही नेमाडे ह्यांचे fan म्हणून मिरवू लागले. पुढे ह्या देशिवादाला हिंदू फोडणीही मिळाली. नेमाडे ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्व वाद्यांना मदत करणार हे लक्ष्यात येताच मी नेमाडे ह्यांच्यावर वैचारिक हल्ले करायला सुरवात केली. भा . ज . प . मधील वाजपायी आणि देशिवादातील नेमाडे ह्यांची व्यक्तिमत्वे अत्यंत उमदी आणि कारीश्मातिक असली तरी ती अंतिमतः हानिकारक आहेत . दोघेही सज्जन आहेत पण दोघेही अंतिमतः डायबेटीस देणारे आहेत साहजिकच नेमाडे ह्यांना प्रखर विरोध करणारे लेख मी १९९०- ९१ साली लिहिले आणि अभिधा सौष्ठव आणि इतरत्र ते छापूनही आले.  माझे साठोत्तरीविरोधातील बंड ह्या लेखांनी अधोरेखित केले .
ह्याचा अर्थ नेमाडे हे ह्या सन्मानाला अपात्र आहेत असा नाही आणि त्यामुळे कुणाला पोटदुखी व्हायची गरजही नाही. नेमाडे ह्यांच्यामुळे देशी वास्तववादी परंपरा अधिक सशक्त झाली आणि त्यांनी पहिली परिपूर्ण नवकादंबरी लिहली हे त्यांचे योगदान कोण नाकारणार ? ते ज्ञानपीठाला  सर्वाधिक पात्र होते ह्याबददल  माझ्या मनात कसलीही शंका नाही पण त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे देशी जादुई वास्तववादाची शक्यता कायमची  गाडली गेली हेही खरेच ! वास्तविक भारतीय परंपरा ही वास्तववादी जितकी आहे तितकी अतिवास्तववादीही आहे पण नेमाडे ह्यांच्या वास्तववादाने कल्पनाशक्तीच मारून टाकली आणि चक्क मराठी कविताही वास्तववादी झाली जगात वास्तववादाचे कवितेत celebration करणारी मराठी कविता ही एक अनोखी कवितासंस्कृती आहे . आक्षेप त्यालाही नाही पण त्यामुळे कवितेत गद्य साजरे करणारे लेखक कवी म्हणून मिरवू लागले आणि त्याने मराठी कविताही बिघडवली त्याचे काय ? हे एक बरेच आहे की नेमाडे हे ह्यापुढे फक्त कविताच लिहणार आहेत कदाचित त्यामुळे त्यांनी सुरु केलेला कवितेतील पद्याचा कर्करोग बरा होईल  
                                 3
ज्यावेळी मराठीत वास्तववादाचा गवगवा सुरु झाला होता त्यावेळी विज्ञानात मात्र वास्तव धोक्यात आले होते सापेक्षतावादाने माणसाला दिसणारे वास्तव हे तो कोठे  आहे आणि त्याची काय गती आहे त्यावर अवलंबून आहे असे सिद्ध करून माणसाच्या इंद्रियशक्तीची हवाच काढून घेतली डोळ्यांनी दिसणारा वेग शून्य  असेल पण तो प्रत्यक्षात लाखो मैल असू शकतो हे कळल्यावर कुठला शहाणा माणूस डोळ्यांनी दिसण्याऱ्या वास्तवावर विश्वास ठेवेल ? नेमाड्यांनी मुळांचा सिद्धांत मांडून भल्याभल्यांना मूर्ख बनवले आणि १९६० नंतर सापेक्ष वास्तववादा ऐवजी निरपेक्ष वास्तववादाचा पारंपारिक पाढा सर्वांनी वाचायला सुरवात केली आणि मग लिहायलाही ! कादंबरी हि मुळात निरपेक्ष वां  आत्मकेंद्री वास्तव सांगायलाच जन्माला आली होती त्यामुळे एकतर पारंपारिक कादंबरी स्वीकारा वा कादंबरीला बदला असे दोनच पर्याय  लेखकाकडे उरले . नेमाडेंनी संपूर्ण मराठी साहित्याला पहिल्या पर्यायात ढकलून दिले आणि प्रतीकादम्बरीचा पर्याय रोखून धरला . स्वामी लिह्ण्याऱ्या रणजीत देसाई ह्यांनी हेच केले होते . त्यामुळे मराठीत पारंपारिक कादंबरीचा मृत्यू झालाच नाही आणि प्रतीकादम्बरीची वाट रोखली गेली सात सक्क त्रेचाळीस ह्या महाकृतीने प्रतीकादम्बरीची वाट शोधली होती पण त्या वाटेने फार लोक गेलेच नाही आणि विसाव्या शतकात प्रतीकादम्बरीचा वाढ होण्याआधीच मृत्यू झाला. 

Sunday, February 8, 2015

SALMAN RASHDIE'S BULLSHIT
shridhar tilve

While writing on Salman Rashdie I always appreciated his writing but criticised his shallow criticism and intellectual bias about marathi  culture . Unfortunately it's still same and on tweeter he has once again bullshited his bias about Marathi culture. I am myself opposed Bhalchandra Nemade on intellectual ground and will do it in future but it doesn't mean that I will tolerate MARGI nonsense . The language of Salman Rashdie only shows his fear and intolerant attitude otherwise why he is answering criticism of NEMADE now? Dear Rushdie, have you read Bhalchandra Nemade? Please stop your nonsense. Indian literature needs harmonious balance among MARGI , DESHI, POTI , JAMATI culture. NEMADE is spreading hate about Margi and you are spreading poison about Deshi . You both are playing dirty politics of self interest which isn't healthy for Indian literature. So go , penetrate and gain some balance.

Saturday, February 7, 2015


नेमाडे आणि ज्ञानपीठ 
श्रीधर तिळवे- नाईक 

प्रथम नेमाडे ह्यांचे मनापासून अभिनंदन !

नेमाडे  ह्यांना ज्ञानपीठ मिळणे अटळच होते कारण तिसऱ्या नवतेतील फक्त पांच जणांना ते मिळण्याची शक्यता होती . विजय तेंडूलकर , दिलीप चित्रे ,  नामदेव ढसाळ , अरुण कोल्हटकर आणि भालचंद्र नेमाडे ह्यातील  चौघांचे  निधन झाल्याने फक्त नेमाडेच  उरले होते .हे पाचही जण ह्या सन्मानाला पात्र होते पण सर्वाधिक पात्र होते भालचंद्र नेमाडे कारण नेमाडे हे फक्त कवी नव्हते  तर सर्वोत्कृष्ट कादंबरीकार होते . त्यांच्या ह्या सन्मानाने मी आनंदलो आहे आणि ह्याचे मराठी साहित्यावर काय परिणाम होऊ शकतात ह्या विचाराने थोडा चिंतीतही  झालो आहे  . 

पुरस्काराला सर्वस्व मानणारे एक कल्चर मराठीत अस्तित्वात आलेले आहे , त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे देशीवादाचा विजय आहे असे मानले जाऊ शकते आणि त्याचा निगेटीव परिणाम मराठी संस्कृतीवर होऊ शकतो . त्यामुळे दिवाळी साजरी करत असताना तिच्यामुळे नेमके कोणते फटाके भविष्यकाळात फुटू शकतात तेही पहावे लागेल 

कुठलीही साहित्यिक चळवळ ही शिम्ग्यासारखी असते ती  नवतेची आग पेटवून तिच्यात परंपरा जाळते । त्यातून जे परंपरेत चांगले असते ते तावूनसुलाखून बाहेर पडते आणि जे राख व्हायच्या लायकीचे असते ते जळून जाते . तिसऱ्या नवतेने जी आग पेटवली त्यात नेमाडे व ढसाळ ह्यांचा सिंहाचा वाटा होता . ह्यातील विजय तेंडूलकर व ढसाळ ह्यांना सन्मान मिळून दिवाळी साजरी झाली फक्त नेमाडेना असे काही मिळावे असे मनापासून वाटत होते . ज्ञानपीठ पुरस्कारामुळे हेही घडले ते बरेच झाले . शेवटी नेमाडे ह्यांचा शिमगा हा ह्या अर्थाने  दिवाळीपर्यंत पोहचला . 

मी आयुष्यभर नेमाडे ह्यांच्याविरोधात लढलो पण त्यांच्या बद्दल पूर्ण आदर बाळगून! नेमाडे हे माझे आवडते शत्रू आहेत . त्यामुळे त्यांच्या '' टीकास्वय वर'' ह्या ग्रंथाला खोडून काढण्यासाठी मी '' टीका हरण '' हा ग्रंथ  लिहला हि टीका नेमाडे ह्यांनी वाचायची तसदी घेतली असेल असे मला वाटत नाही मात्र नेमाडे ह्यांच्या काही समर्थकांचा मी शत्रू झालो आणि देशीवाद्यांच्या काळ्या यादीत गेलो .  देशीवाद्यांच्या काळ्या यादीत जाणे म्हणजे अलिखित देशी परंपरेनुसार वाळीत टाकले जाणे ! एकाच वेळी गंभीर देशीवादी आणि उथळ नव्वदोत्तरी लोकांचे शत्रुत्व मी पत्करल्याने दोन्ही बाजूनी माझा खून होणे अटळ होते . तो होतानाही नेमाडे ह्यांच्यावर टीका करणे मी सोडले नाही कारण नेमाडे ह्यांचा देशीवाद आणि वाजपायी आणि मोदी ह्यांचा हिंदुत्ववाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे माझे स्पष्ट मत आहे . नेमाडे ह्यांना नरेंद्र मोदी सत्येवर आल्यावर ज्ञानपीठ मिळाले हा योगायोग नसून हिंदुत्ववादी विचारप्रणाली दोन चेहऱ्यांनी ह्या देशावर राज्य करणार असल्याचे ते संसूचन आहे .दुर्देवाने आपला ओ बी सी वर्ग हा अजूनही सर्व गोष्टी नीट समजून घेत नाही कारण त्याला क्षत्रिय होण्याचा हा राजमार्ग आहे असे वाटते . नेमाडे हे नीट ओळखून आहेत आणि मोदीही ! ह्याचा राजकीय परिणाम चांगला होण्याची शक्यता मी नाकारत नाही पण तो परिणाम अल्पकालीन ठरण्याची शक्यता अधिक आहे ऱाजा होणे कुणाला आवडत नाही? पण हे राजेपद नंतर ब्राह्मनाळणारे होणार असेल तर दीर्घकालीन युद्धात ते महाग पडू शकते . लढाई जिंकून युद्ध हरण्याची भारतीय परंपरा आहेच

नेमाडे ह्यांचा देशीवाद ऑउट्डेटेड झालाय हि वस्तूस्थिति . किंबुह्ना ज्ञानपीठ हा सन्मान  तुम्ही आऊटडेटेड झाल्यावरच मिळतो . अनुयायी नेहमी प्रस्थापित आणि  आऊटडेटेड गोष्टींना मिळतात त्यामुळे नेमाडे हे आता कॉन्ग्रसी गवतासारखे सर्वत्र उगवणे अटळ . काही भूछत्राना वटवृक्षाचा दर्जा मिळणे अटळ . आणि हे सर्व देशीवादाच्या नावाने होणे अटळ

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खूद्द नेमाडे अजिबात देशीवादी नाहीत . जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या ते प्रेमात असतात त्यामुळे समता पुरस्कार स्वीकारताना त्यांना व्हितगेस्तैन आणि द्स्तैव्स्की  आठवतात .स्व ताच्या साहित्यात जागतिकीकरण साजरे करणारे नेमाडे नंतरच्या पिढ्यांची मात्र देशीवादाच्या नावाखाली दिशाभूल करत फिरत असतात हि दिशाभूल आता अधिक सशक्त होणे अटळ आहे . नेमाडे ह्यांना मिळालेला पुरस्कार हा मार्गी आणि देशी ह्यांचा अजोड समन्वय करण्याऱ्या अभूतपूर्व प्रतिभावंताला मिळालेला पुरस्कार आहे कोसला हि फक्त म्ह्हा नुभवी पंथा मुळे शक्य झालेली नसून त्यात catcher in the wry चा हि सिंहाचा वाटा आहे अमेरिकन आणि मराठी संस्कृतीचा हा समन्वय आहे . ज्या देशीवादाची दुहाई नेमाडे देतात तो देशीवाद किती अमेरिकन आहे ते मी चौथी नवता ह्या ग्रंथात मांडले आहेच .'' लोकां सांगे देशीवाद स्व ता मात्र जागतीक वादी  '' असे  नेमाडे ह्यांचे धोरण आहे . त्यामुळे नेमाडे ह्यांना मिळालेला पुरस्कार हा देशीवादाच्या नावाखाली साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक वसुधैव कुटुंबवादाला मिळालेला पुरस्कार आहे हे आपण सर्व मराठी भाषिकांनी लक्ष्य।त घ्यावे हे उत्तम .

नेमाडे हे लेखक म्हणून मुळीच जातीयवादी नाहीत पण विचारवंत म्ह णून ते जातीयवाद बळकट करतात . त्यांना जातिव्यवस्थेचा उभा ब्राह्मणी अक्ष अमान्य आहे पण आडवा अक्ष मान्य आहे . महात्मा गांधीनी जी चूक केली तीच चूक नेमाडे इथे करतायत ह्या बाबतीत मी माझे म्हणणे ''आत्मचरित्रातले  काल्पनिक क्षण '' ह्या netamblage मध्ये सविस्तर मांडले आहे ते पहावे . इतकेच सांगतो कि जाती व्यवस्था  हि package डील  आहे . ती जेव्हा आडवा अक्ष घेवून येईल तेव्हा तिला उभे करणारे महाभाग निर्माण होऊन ती उभा अक्ष सोबत घेवूनच येईल नेमाडे ह्यांना ह्या वयातही हे कळू नये हे आपले दुर्देव तेव्हा ज्यांना जाती व्यवस्था मूळापासून नष्ट व्हावी असे वाटते त्यांनी नेमाडे ह्यांच्या नादी लागू नये हे बरे . नेमाडे ह्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या विचारातील हा धोका लक्ष्यात घेऊनच त्यांचे अभिनंदन करावे हे उत्तम.

नेमाडे ह्यांचे  पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो .

श्रीधर तिळवे 


Tuesday, February 3, 2015

REBEL AGAINST POSTMODERNISM


When I wrote a poem 'post post post'  concepting  my personnel rebel against postmodernism I didn't  know that  similar kind of movements are taking place all over the world. The poem appeared in first issue of neolittlemagazine  'SAUSHTHAV'(feb 1993).
After an emergence of biosignoverse new changes were taking  place in India. Telenets , Internet and other semiodities starts displacing the importence of commodities. Computer and T V which were commodities till 1985 got trosformed into semiodity after an emergence and spread of internet and telenets.
Postmodernism was supporting all kind of fragmentations in the name of REBEL AGAINST EUROPEON METANARRATIVES OR REBEL AGAINST ALL KIND OF METANARRATIVES including nativism which was promoting desi  fregmentalism  to establish independent identity ( like MARATHI IDENTITY ) and rebelling against COLONIAL METANARRATIVES assuming that so called NATIVE CULTURE WAS DOING PERFECT JUSTICE TO ALL MEMBERS OF NATIVE CULTURE. It was false assumption based on many misreadings about native culture.

A new rebel was necessary at that time and I was waiting for it . Unfortunately nobody did it and I wrote an article'' CHAUTHI PARAMPARA'' to express my discontent  about post-sixty literature in India . I had written 150 NONTHINGIST POEMS (nirwastuwadi kavita) at that time against THINGISM IN GERMAN LITERATURE which was expressing COMMODIFICATION OF GERMAN SOCIETY WITH GREAT ACCURACY. Hindi and marathi poets were and are following  thingism consciously or unconsciously. So nonthingism was necessary and I was unintentionally professing it in my nonthingist  poems . We had low budget so naturally smallsize poems became obvious choice. ''post-post-post'' was one of them. Now it's available in my collection of poems titled  '' KA.VI.''