Sunday, January 26, 2020

मी आयुष्यात जी काही पथ्ये पाळतो त्यातील एक म्हणजे ज्या विषयावर काम करायचं ठरवलंय त्यावर काम करणे वर्तमान काळ कायमच तुमचे प्रोजेक्ट डिस्टर्ब् करत असतो अशावेळी अजिबात विचलित न होता आपल्या प्रोजेक्टवर काम करणे हे मला आवश्यक वाटतं कोल्हापुरात असतांना वैचारिक पातळीवर बाबासाहेब आंबेडकर गांधी आणि मार्क्स ह्यांच्यावर मला लिखाण करणे आवश्यक वाटले ते मी केलं (त्यातूनच परिवर्तनवाद का कोसळला चा प्रपंच झाला ) ह्या काळातील माझा लेखनप्रपंच हा प्रामुख्याने कविता कथा आणि नाटक ह्यांच्यावर केंद्रित होता कोल्हापूर शहर एक्स्प्लोर करणे हे काम मी नेटाने केले स्थानिक संस्कृती ही ह्या काळात मला महत्वाची वाटत होती आणि तिच्यावर पडणारे मार्गी ताणही !

१९८८ ते १९९५ हा काळ मी जरी चौथ्या नवतेची चळवळ चालवत होतो तरी नाटकात पीएचडी करत होतो ह्या काळात मी जे लिहिले त्याचीच व्याख्याने सद्या मुंबई विद्यापीठात देतो सगळी चिन्हकी व सगळे इजम पूर्वी माहित असले तरी ह्या काळात ते अकादमिकली कोळून प्यायलो ह्याच काळात अडा हॉ का बा ना सु ना लिहिली कारण फावला वेळ मुबलक होता चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या मुंबईत दाखल झालेला आउटसायडर चमकत राहिला

बांधकाम चालू आहे वर १९९६ ला केस झाली आणि आयुष्य बदलले धर्म नावाची आणखी एक महाकादंबरी लिहिली चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व कविता कंटिन्यू राहिल्या २००२ नंतर अर्थ ही महाकादंबरी लिहायला घेतली जेएनयू मध्ये व्याख्यान दिले आणि त्याचा विस्तार म्हणून २००५ ते २०१० हा कालखंड मी इतिहासाला दिला चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या

जोशी कि कांबळे ही फिल्म माझ्या आयुष्यातील आणखी एक टर्निंग पॉईंट तिच्यामुळे फिल्म इंडस्ट्री फुल्ल टाइम झाली नेट सिरीजमधल्या कविता ह्या बदलामुळे सुरु झाल्या नाटक आणि फिल्म्स ह्यांची संख्या वाढली ह्या काळात हातात घेतलेली मोक्ष ही कादंबरी काही पूर्ण झाली नाही राहुल सरवटे विदेशात गेल्याने पुढे फेसबुक आल्याने व इतर काही कारणांनीं सौष्ठव बंद केले

२००४ नंतर पुन्हा आयुष्याने पलटी मारली अपघात झाला हल्ले झाले शारीरिक फिटनेसची वाट लागली कवितांची निर्वाण सिरीज इथूनच सुरु झाली फेसबुकवर प्रचंड ऍक्टिव्ह झालो कारण शारीरिक लांब पल्ल्याच्या हालचालींना आलेली मर्यादा मोक्ष कादंबरी लिहायला पुन्हा घेतली पण पूर्ण होईना नाटकांवरच्या व्याख्यानांचा परिणाम म्हणून नवी नाटके लिहिली मुख्य लक्ष अध्यात्मिक लिखाणाकडे लागले मोदींच्यामुळे इतिहासातील हिंदुत्व पुन्हा न्याहाळणे सुरु झाले काही भागांचे मराठी भाषांतर केले क्वचित समकालीन आयाम दिला

यांतल्या प्रत्येक कालखंडात ज्यावर फोकस आहे त्यावरच लिखाण केले वर्तमानाला प्रतिक्रिया कवितेतून येतातच वेगळी गद्य प्रतिक्रिया प्रत्येकवेळी का द्यावी ? ह्यापुढे माझे सर्व लक्ष्य हे मोक्षिक लिखाणावर केंद्रित असणार आहे त्यामुळे कधी न्हवे ते माझ्या कवितांचा वेग आता मंदावलाय जगाचा प्रपंच सांभाळायला नितीन वाघ स्वप्नील शेळके प्रणव सखदेव पासून ह्रिषीकेश गुप्तेपर्यंत अनेक नवे लेखक समर्थ असतांना आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचे आता काय काम असाही एक विचार आहेच