Sunday, November 8, 2015

नितीशांचा विजय अपेक्षित होता मात्र ते एवढ्या सीट्स जिंकतील असे वाटले न्हवते  हा एकमेव जद नेता असा आहे जो विचारप्रणालीच्या पुढे जाऊन सुव्यवस्थापनाकडे वळला . ह्या निवडणुकीत त्याने कॅम्पेन गुरु आणून चौथ्या नवतेची चिन्ह तांत्रिकी वापरली आणि त्याचा फायदाही झाला . गेली कित्येक वर्षे हा नेता प्रांत वगैरे न पाहता भारतभरातून गुणी माणसे गोळा करून त्यांना बिहारच्या विकासासाठी वापरतोय आणि त्याची फळेही दिसतायत आता लालूप्रसाद यादवांनी त्यांचा कट्टर बिहारवाद आणला नाही म्हणजे मिळवले अन्यथा पुन्हा भांडण अटळ . मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो . ते कुशल नेते आहेत आणि बिहार आणखी पुढे न्हेतीलच . काँग्रेस नष्ट होणे ही मात्र चिंतेची बाब आहे . कुणी काहीही म्हंटले तरी हा शेवटी प्रादेशिक पक्षाचा विजय आहे . काँग्रेस जितक्या लवकर रिस्टोअर करेल तितके बरे अन्यथा ……

श्रीधर तिळवे 

No comments: