Saturday, June 24, 2023

 मोदी आणि अमेरिका वारी श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही आंतरराष्ट्रीय भेटीचे चार  टप्पे असतात 

१ डेकोरेशन 

२ निगोशिएशन 

३ अग्रीमेंट करार 

४ पोस्टनिगोशिएशन 

भारतात मीडियाला डेकोरेशनवर चर्चा करायची इतकी सवय झालीये कि बॉलिवूडनंतर सर्वात मोठी एन्टरटेनमेन्ट म्हणून न्यूज चॅनेल्सचा उल्लेख करावा लागेल साहजिकच ह्यावेळींहि डेकोरेशनवर जास्त चर्चा झाली वास्तविक डेकोरेशन हे नेते व देश ह्यांच्या मनात एकमेकांविषयी नेमके काय आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी केले जाते म्हणजे इंदिरा गांधींनी एकदा डेकोरेशनमध्ये रशियाने त्यांच्या पंतप्रधानपदाचा यथोचित सन्मान झाला नाही तर तडक पाठ फिरवली होती (मला त्यांच्या ज्या काही राजकीय कृत्या आवडतात त्यापैकी ही एक आहे ) 

मोदी ह्यांना इंग्लिश येणे न येणे ह्याची चर्चा कलोनियल स्लॅव्हरी दर्शवते अमेरिकन अध्यक्ष येतात तेव्हा भारतीय भाषा शिकून येतात काय ? मुळात मोदींनी इंग्लिशमध्ये बोलायलाच नको होते सरळ हिंदी भाषेत बोलावं दुभाषे शेवटी असतात कशाला ? ज्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे त्याच भाषेत बोलावे उगाच इंटरनॅशनल इम्प्रेशन मारायला जावे कशाला ?

अल्पसंख्याकांचा प्रश्न पोलिटिकल लेव्हलला त्या त्या देशाची डायमेन्शन घेऊन येतो म्हणजे अमेरिका जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा पॉलिटिकली तिला ख्रिस्चन म्हणायचे असते तर यु ए इ किंवा कतार जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा त्यांना पॉलिटिकली मुस्लिम असं म्हणायचं असतं स्पष्टपणे असं कोणी म्हणत नाही ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात 

मोदी जो करार घेऊन आलेत तो बऱ्यापैकी यशस्वी करार आहे अजूनही आपणाला कोणीही १०० टक्के तंत्रज्ञान देत नाहीये आपण तंत्रज्ञानातं स्वयंभू होणे हाच त्यावरचा उपाय आहे मोदी सरकारांनी त्यासाठी काय केलं ? नेहरूंना शिव्या देणं फार सोपं आहे पण नेहरूंनी ह्याबाबत जेवढं केलं तेवढंही तुम्हांला करता आलेलं नाही ही वस्तुस्थिती ! पुष्पक विमाने उडवून प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी तयार होत नाही ती सतत इन्व्हेन्ट करावी लागते नाहीतर मग तुम्ही आयात करता तशी आयात करावी लागते 

अमेरिकेचे अध्यक्ष काय सांगतात त्यापेक्षा भारतीय पंतप्रधान म्हणून अल्पसंख्याकांचा प्रश्न ते कसे हाताळतात ते इंडियन आणि नैतिक मानकांच्या आधारे ठरवणे शक्य आहे क्रिमिनल प्रोसिजरमध्ये वर्ग धर्म वर्ण जात जमात ह्यापैकी काहीही येता कामा नयेत गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो एखाद्या वर्ग धर्म वर्ण जात जमात केंद्री विशिष्ट ग्रुपमध्ये गुन्हेगारी जास्त असेल तर त्याची समाजविद्यीय चिकित्सा व्हायलाच हवी पण ह्या  चिकित्सेचा आधार समाजविद्येने ठरवलेल्या पुराव्यांच्या आधारे व छाननीनुसार व्हायला हवा त्याऐवजी केवळ एखाद्या ग्रुपला वा समुदायाला म्हणजे एखाद्या धर्माला जातीला वर्णाला टार्गेट करायला म्हणून ती केली जाणार असेल तर औरंगजेब आणि आपण ह्यांच्यात फरक काय उरतो ? सध्या दोन्ही बाजूंनी विवेक गहाण पडलाय का अशीच शंका आहे मोदींनी आधी समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा ते न करता वेळकाढूपणा चालणार असेल तर भाजपला लोकांनी कशाला निवडून दिलंय ह्याचा भाजपला विसर पडलाय असंच म्हंटल पाहिजे . पुरोगामी लोक अजूनही फाळणीपूर्व माहोलमध्ये अडकून पडले आहेत उत्तरफाळणी पोस्टपार्टीशन काळ सुरु झालाय ह्याची त्यांना खबरच नाही एकतर तुम्हाला पूर्ण सेक्युलर व्हावे लागेल किंवा पूर्ण हिंदुत्ववादी ! अर्धंसेक्युलर राहण्याचा कालखंड १९९० साली संपायला सुरवात झालीये आणि २०१४ साली तो पूर्णच संपलाय तेव्हा अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय साधणार ?माओ त्से तुंगने नेहरूबाबत एकदा म्हंटल होतं कि नेहरूंना इंडिया हा आशियाचा भाग आहे ह्याचा विसर पडलाय असं दिसतंय . पुरोगामी लोकांची हीच स्थिती आहे आपण भारतात राहतोय ह्याचा त्यांना विसर पडलाय 

श्रीधर तिळवे नाईक 



No comments: