Thursday, June 8, 2017

मला दोन सख्ख्या बहिणी  बायजी (सुमंगला )आणि उजू (उज्वला ) .बायजी माझी जणू दुसरी आईच  तर  उजू माझी सर्वात बेस्ट फ्रेंड संन्याशाच्या आयुष्यात  प्रेयस्याच्या पेक्षा त्याच्या आईबहिणी  जवळच्या होणे  अटळ  ! मृत्यू हा खरेतर आनंदाचा क्षण  ! जीर्ण झालेले शरीर फेकून नवे शरीर शोधण्याचा  !  पण तरीही ह्या क्षणात आनंदाने बुद्धाच्या मृत्यूनंतर म्हंटले तसे   ते सुंदर शरीर  गेल्याचे  दुःख  आहेच आणि आमची उजू तर  छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारी अगदी मृत्यूपूर्वीही चार तास आधी बायजीला '' सकारात्मक रहा '' असं सांगणारी  . तिचे शेवटचे शब्द पूर्ण सकारात्मक ! तर शरीर गेले आणि तिच्यावर वेळोवेळी लिहिलेल्या कविता उरल्या . त्या देतोय . एका अर्थानं तीच तेरावं मी कविता टाकून करतोय म्हणा ना ! तिलाही हे असं आवडलं असतं .

No comments: