Wednesday, July 12, 2023

मिलान कुंदेरा श्रीधर तिळवे नाईक 

मिलान कुंदेरा गेला माझ्या कादंबरीकुळाचा हयात असलेला महाकादंबरीकार गेला 

प्रत्येक कादंबरीकाराचे स्वतःचे म्हणून असे घराणे असते माझे घराणे मराठीत अनुवंशहीन असले तरी जागतिक साहित्यात त्याचा वावर आहे ह्या कादंबरीकुळाचा आदिपुरुष महर्षी व्यास ! भाव , कल्पना आणि विचार ह्यांचा परफेक्ट समतोल साधत स्वतःच्या दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक घोड्यावर परफेक्ट मांड ठोकून संपूर्ण जगभरचा प्रवास भाषेत ट्रान्सफॉर्म करणे हे ह्या कुळाचे आदिम वैशिष्ट्य ! मराठीत भाव आहे तर विचार नाही दोन्ही असतील तर दार्शनिक घोडा नाही तिन्ही असतील तर कल्पनेचा पत्ता नाही असा सगळा घोळ ! साहजिकच मराठीतील एकाही कादंबरीकाराशी माझं जमलं नाही माझ्यावर सुरवातीच्या विद्यार्थी दशेत सखोल प्रभाव पडला तो व्यासांचा आणि कवितेत असाच समतोल साधणाऱ्या ज्ञानेश्वरांचा !

व्यासांची दार्शनिक मांडणी मला कधीच पटली नाही पण त्यांची घौडदौड करण्याची शैली मला पटली पुरोगामी कालखंडातला तर एकही कादंबरीकार मला आवडला नाही मात्र आधुनिक काळात असा कादंबरीकार मला वाटला तो जॉ पाल सार्त्र ! अस्तित्ववादाची पक्की मांड आणि भाव विचार ह्यांचा समतोल त्याच्यात मला आढळला त्यानंतर माझ्या आयुष्यात आला उत्तराधुनिक मिलान कुंदेरा !

The Unbearable Lightness of Being ही माझी त्याची सर्वात आवडती कादंबरी ! आधुनिकतेनं जो The Unbearable heaviness  Being ला दिला होता त्याला लायटर पण गहन करत व्यक्त करण्याची ही शैली मला ज्याम आवडली खरेतर आयुष्याकडे जोक म्हणून पाहायला त्याने पहिल्याच कादंबरीत सुरवात केली अस्तित्वाच्या एकटेपणाऐवजी दुकटेपणावर त्याचा जोर होता “Two people in love, alone, isolated from the world, that's beautiful.”हे तसं भारीच होतं 

त्याने पुरोगामी कादंबरीतला व्यक्तिरेखा उभा करण्याचा मोह कायमच टाळला The Unbearable Lightness of Being मध्ये 

He had first met Tereza about three weeks earlier in a small Czech town. They had spent scarcely an hour together. She had accompanied him to the station and waited with him until he boarded the train. Ten days later she paid him a visit. They made love the day she arrived. That night she came down with a fever and stayed a whole week in his flat with the flu.

अशी वर्णनात्मक सुरवात करत नंतर मग 

And all at once he fancied she had been with him for many years and was dying. He had a sudden clear feeling that he would not survive her death. He would lie down beside her and want to die with her. He pressed his face into the pillow beside her head and kept it there for a long time. Now he was standing at the window trying to call that moment to account. What could ithave been if not love declaring itself to him?

But was it love? The feeling of wanting to die beside her was clearly exaggerated: he had seen her only once before in his life! Was it simply the hysteria of a man who, aware deep down of his inaptitude for love, felt the self-deluding need to simulate it? His unconscious was so cowardly that the best partner it could choose for its little comedy was this miserable provincial waitress with practically no chance at all to enter his life! 

असं काहीतरी येतं 

लेखक असणे म्हणजे सत्य शोधणे हे त्याला नीट कळलं होतं त्याची कल्पनाशक्ती स्वप्नील न्हवती तर फिक्शनल आणि फिलॉसॉफिकल होती साहजिकच कल्पनांची धुळवड उडण्याऐवजी एखाद्या खिडकीची काच पतंग म्हणून आभाळात उंच उडावी तसं काहीसं त्याच्या शैलीत कल्पनेचं व्हायचं वास्तवाचा त्याला तिटकारा न्हवता पण वास्तवाला इंट्रोस्पेक्टिव्ह सेल्फटच देण्यात तो वाकबगार होता बेकेटची मितव्यय शैली त्याने आत्मसात केली होती पण तिचा एकसाचेपणा त्याने टाळला बेकेट काय किंवा कुंदेरा काय दोघेही प्रथम कवी होते आणि त्याचा प्रत्यय गद्यातही दरवळता ठेवण्यात दोघे वाकबगार होते 

उत्तरआधुनिकतेनं केंद्रस्थानी आणलेला आयडेंटिटीचा प्रश्न त्याच्या कादंबऱ्यांत वारंवार येतो आधुनिक अस्तित्वाकडून उत्तराधुनिक आयडेंटिटीकडे झालेला प्रवास अनेकदा त्याच्या पात्रात आढळतो 

ओळखीचा पायाच मुळी मेमरी असतो त्यानेच म्हंटल्याप्रमाणे "The first step in liquidating a people is to erase its memory. Destroy its books, its culture, its history. Then have somebody write new books, manufacture a new culture, invent a new history. Before long that nation will begin to forget what it is and what it was... The struggle of man against power is the struggle of memory against forgetting."

तो आफ्टर अम्नेशियावर बोलत नाही तर अम्नेशिया येऊ नये म्हणून मेमरी सतत जिवंत ठेवण्याची आवश्यकता पटवतो राजकारण नेहमीच मतदारांची मेमरी खतम करून त्यांना नवीन आठवणी पुरवण्यासाठी धडपडत असतं अशावेळी नवीन मेमरीनां जागा देत जुन्या आठवणी जिवंत ठेवणं हा राजकीय लढ्याचा आवश्यक भाग बनतो ब्रिटिशांनी भारतीयांची मेमरी आपल्या हिशेबाने चालवली प्रत्येक साम्राज्यवादी नेता हे करतो अशावेळी आपल्या सांस्कृतिक आठवणी शाबूत ठेवणे फार गरजेचं बनतं कुंदेराच्या कादंबऱ्यात हे सर्व येते करुणा खूप हेवी असते म्हणूनच दुसऱ्याविषयीचे दुःख आपलं अंतःकरण जड करतं “Speak truth to power." असं त्यानं एके ठिकाणी म्हंटल आहेच प्रश्न इतकाच पॉवर बहिरी असेल तर ! निदान मग स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी तरी पॉवर ऐको न ऐको आपण बोलत राहिलो पाहिजे कला आजच्या काळात स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी बहिऱ्यांच्यापुढे केलेले संभाषण आहे संप्रेषण आहे 

विलास सारंगांनी आधुनिक दृष्टिकोनातून नॉस्टलजियावर टीका केली होती मिलांन कुंदेरा उलट दिशेनं जातो The Greek word for “return” is nostos. Algos means “suffering.” So nostalgia is the suffering caused by an unappeased yearning to return.” असं म्हणतो आज नॉस्टलजिया स्वप्नरंजन राहिलेला नाही तो रिटर्न ऑफ सफरींग बनला आहे कारण मायग्रेशन झाल्यानंतर नॉस्टलजिया पाठलाग करतो कुंदेरा आपल्या देशातून फ्रान्समध्ये मायग्रेट झाला होता साहजिकच नॉस्टॅलजिया फक्त भूतकाळ नाही तर जे मागे उरलेत त्यांचे काय ह्यांची काळजीही आहे चिंताही आहे 

आईन्स्टाईनने “Weak people revenge. Strong people forgive. Intelligent People Ignore.” असं म्हंटलं होतं आज सोशल मीडिया इंटीलिजन्ट लोकांना इग्नोर करूच देत नाही विशेषतः कम्युनिझममध्ये हे फारच अवघड बनलं होतं आत्महत्येचं सुप्त पोटेन्शियल पदोपदी तुम्हाला आजमावत असताना टिकून राहण्यातच आयुष्य खर्ची पडणं अटळ ! कुंदेराने आपलं आयुष्य कादंबरीत खर्च केलं 

त्याच्या आयडेंटिटी ह्या लघुकादंबरीत दोन वेट्रेसमधील एक संवाद आहे 

At the far side of the room, near the door to the kitchen, two waitresses were deep in discussion. Since she hated to raise her voice, Chantal got up, crossed the room, and stopped beside them; but they were too absorbed by their topic: "I'm telling you, it's ten years already. I know them. It's terrible and there's not a trace. None. It was on TV." The other one: "What could have happened to him?" "Nobody can even imagine. And that's what's horrible."

माहीत नसणं हे एकवेळ ठीक पण काय घडलं त्याची कल्पनाही करता येऊ नये हे जास्त हॉरिबल आहे 

व्यासांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका युगाच्या अस्ताविषयी बोलतायत सार्त्र आधुनिक युगाच्या अस्ताविषयी बोलतोय तर कुंदेरा कम्म्युनिझमच्या अस्ताविषयी बोलतोय आमच्या पिढीवर  उत्तराधुनिकतेच्या अस्ताविषयी बोलण्याची वेळ आली इरावती कर्वेनीं ह्याला युगांत म्हंटलं होतं हा युगांत ज्यांना पेलायचा आहे त्यांना कुंदेराचे वाचन मस्ट आहे 

श्रीधर तिळवे नाईक 







Saturday, June 24, 2023

 मोदी आणि अमेरिका वारी श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही आंतरराष्ट्रीय भेटीचे चार  टप्पे असतात 

१ डेकोरेशन 

२ निगोशिएशन 

३ अग्रीमेंट करार 

४ पोस्टनिगोशिएशन 

भारतात मीडियाला डेकोरेशनवर चर्चा करायची इतकी सवय झालीये कि बॉलिवूडनंतर सर्वात मोठी एन्टरटेनमेन्ट म्हणून न्यूज चॅनेल्सचा उल्लेख करावा लागेल साहजिकच ह्यावेळींहि डेकोरेशनवर जास्त चर्चा झाली वास्तविक डेकोरेशन हे नेते व देश ह्यांच्या मनात एकमेकांविषयी नेमके काय आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी केले जाते म्हणजे इंदिरा गांधींनी एकदा डेकोरेशनमध्ये रशियाने त्यांच्या पंतप्रधानपदाचा यथोचित सन्मान झाला नाही तर तडक पाठ फिरवली होती (मला त्यांच्या ज्या काही राजकीय कृत्या आवडतात त्यापैकी ही एक आहे ) 

मोदी ह्यांना इंग्लिश येणे न येणे ह्याची चर्चा कलोनियल स्लॅव्हरी दर्शवते अमेरिकन अध्यक्ष येतात तेव्हा भारतीय भाषा शिकून येतात काय ? मुळात मोदींनी इंग्लिशमध्ये बोलायलाच नको होते सरळ हिंदी भाषेत बोलावं दुभाषे शेवटी असतात कशाला ? ज्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे त्याच भाषेत बोलावे उगाच इंटरनॅशनल इम्प्रेशन मारायला जावे कशाला ?

अल्पसंख्याकांचा प्रश्न पोलिटिकल लेव्हलला त्या त्या देशाची डायमेन्शन घेऊन येतो म्हणजे अमेरिका जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा पॉलिटिकली तिला ख्रिस्चन म्हणायचे असते तर यु ए इ किंवा कतार जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा त्यांना पॉलिटिकली मुस्लिम असं म्हणायचं असतं स्पष्टपणे असं कोणी म्हणत नाही ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात 

मोदी जो करार घेऊन आलेत तो बऱ्यापैकी यशस्वी करार आहे अजूनही आपणाला कोणीही १०० टक्के तंत्रज्ञान देत नाहीये आपण तंत्रज्ञानातं स्वयंभू होणे हाच त्यावरचा उपाय आहे मोदी सरकारांनी त्यासाठी काय केलं ? नेहरूंना शिव्या देणं फार सोपं आहे पण नेहरूंनी ह्याबाबत जेवढं केलं तेवढंही तुम्हांला करता आलेलं नाही ही वस्तुस्थिती ! पुष्पक विमाने उडवून प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी तयार होत नाही ती सतत इन्व्हेन्ट करावी लागते नाहीतर मग तुम्ही आयात करता तशी आयात करावी लागते 

अमेरिकेचे अध्यक्ष काय सांगतात त्यापेक्षा भारतीय पंतप्रधान म्हणून अल्पसंख्याकांचा प्रश्न ते कसे हाताळतात ते इंडियन आणि नैतिक मानकांच्या आधारे ठरवणे शक्य आहे क्रिमिनल प्रोसिजरमध्ये वर्ग धर्म वर्ण जात जमात ह्यापैकी काहीही येता कामा नयेत गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो एखाद्या वर्ग धर्म वर्ण जात जमात केंद्री विशिष्ट ग्रुपमध्ये गुन्हेगारी जास्त असेल तर त्याची समाजविद्यीय चिकित्सा व्हायलाच हवी पण ह्या  चिकित्सेचा आधार समाजविद्येने ठरवलेल्या पुराव्यांच्या आधारे व छाननीनुसार व्हायला हवा त्याऐवजी केवळ एखाद्या ग्रुपला वा समुदायाला म्हणजे एखाद्या धर्माला जातीला वर्णाला टार्गेट करायला म्हणून ती केली जाणार असेल तर औरंगजेब आणि आपण ह्यांच्यात फरक काय उरतो ? सध्या दोन्ही बाजूंनी विवेक गहाण पडलाय का अशीच शंका आहे मोदींनी आधी समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा ते न करता वेळकाढूपणा चालणार असेल तर भाजपला लोकांनी कशाला निवडून दिलंय ह्याचा भाजपला विसर पडलाय असंच म्हंटल पाहिजे . पुरोगामी लोक अजूनही फाळणीपूर्व माहोलमध्ये अडकून पडले आहेत उत्तरफाळणी पोस्टपार्टीशन काळ सुरु झालाय ह्याची त्यांना खबरच नाही एकतर तुम्हाला पूर्ण सेक्युलर व्हावे लागेल किंवा पूर्ण हिंदुत्ववादी ! अर्धंसेक्युलर राहण्याचा कालखंड १९९० साली संपायला सुरवात झालीये आणि २०१४ साली तो पूर्णच संपलाय तेव्हा अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय साधणार ?माओ त्से तुंगने नेहरूबाबत एकदा म्हंटल होतं कि नेहरूंना इंडिया हा आशियाचा भाग आहे ह्याचा विसर पडलाय असं दिसतंय . पुरोगामी लोकांची हीच स्थिती आहे आपण भारतात राहतोय ह्याचा त्यांना विसर पडलाय 

श्रीधर तिळवे नाईक 



Sunday, June 4, 2023

 गिरीश मिस्त्री : क्रिएटिव्ह फोटोग्राफीचा प्रवर्तक श्रीधर तिळवे नाईक 


२२ मेला गिरीश कार्डियाक अरेस्टने गेला . भारताचा एक जबरा सररियल फोटोग्राफर गेला . फॅशनचे जग बदलणारा फ्रंट प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीचा इंडियातील पायोनियर गेला टाइम्स ऑफ इंडियाच्या फोटोग्राफी जर्नलचा पाहुणा संपादक गेला अशियन फोटोग्राफीत १० मोस्ट इन्फ्लुएन्शियल पिपलमध्ये तीन वेळा समावेश असलेला फिलॉसॉफर फोटोग्राफर गेला आणि  मुंबईतील माझा पहिला अथपासून इतिपर्यंत मुंबईकर असलेला मित्र गेला .  त्याच्या मरणाची बातमी त्याची बहीण हेमाद्वारा माझ्यापर्यंत खूपच उशिरा पोहचली . तरीही त्या बातमीतले दुखांश फेरी मारून गेलेच . 

त्याची माझी ओळख माझी मानलेली बहीण कल्पना हिने करून दिली मुळात मी १९८९ ला मुंबईत रहिवासासाठी उतरलो तेव्हा माझ्यासाठी आधार होता तो कल्पना आणि महाडेश्वर कुटुंबीय ह्यांचा ! ही मुंबईतील माझी पहिली फॅमिली ! कल्पनाने मी मुंबईत उतरल्या उतरल्या तिच्या फोर्टच्या  ऑफिसात बोलावले आणि तिच्या बॉसची म्हणजे गिरीशच्या वडिलांची ओळख करून दिली मला येणाऱ्या फ्लॅशेसची चर्चा मी मुंबईत येण्याआधीच पोहचली होती आणि मिस्त्री भविष्य जाणायला उत्सुक होते ते त्यावेळी मुंबईतले नामाकिंत सीए होते तरीही त्यांचे प्रश्न होते मला फ्लॅशेस आल्याने मी बोलत गेलो आणि मला मुंबईतील रहिवासाच्या पहिल्याच दिवशी दुसरी फॅमिली मिळाली 

गिरीश मला भेटायला उत्सुक होता तो वडिलांच्यामुळे ! पाऊणे सहा सहा फूट दरम्यान उंची गोरा रंग ब्रॉड चेहरा भव्य कपाळ सरळ पण मोठे नाक भेदक डोळे त्याला एक टिपिकल पारशी देखणेपण देत होते . तो चालतांना बोलतांना एखाद्या सिंहासारखा असायचा पर्शियन सिंहच बसलाय किंवा चालतोय असं वाटायचं 

कमर्शियल फोटोग्राफर म्हणून त्याने १९८३ ला कामाला सुरवात केली त्याकाळात टेक्नॉलॉजिकल अड्वान्समेंट फार नसल्याने व फोटोशॉप अस्तित्वात नसल्याने फोटोग्राफर्सना खूप ऍक्युरेट आणि प्रिसाईज असणे भाग असायचे ते अपरिहार्य होते तो तसा होताच त्यामुळे शूट करतांना कधीकधी राग नाकावर !

पहिल्या भेटीत कुठल्याही फोटोग्राफरचे प्रश्न असतात तेच त्याने विचारले मी त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची गॅरेंटी दिली. मी कवी आहे म्हंटल्यावर फ्यूचरॉलॉजी साईडलाईन झाली आणि कलेवर  खोलवर चर्चा सुरु झाली जगातल्या नामाकिंत फोटोग्राफरवर व त्यांच्या कामावर गिरीशची मास्टरी होती त्यामुळे चर्चेला मजा यायला लागली त्याचे स्वतःचे काम त्यावेळी रियॅलिझ्मकडून सररियॅलिझमकडे जाणारे होते त्यामुळे त्यावर चर्चा अटळच होती  

प्रकाशावरचे व शॅडो पॅटर्न्सवरचे त्याचे नियंत्रण असामान्य होते त्याला फोटोग्राफीला पेंटिंगमध्ये कन्व्हर्ट करायचे होते ती हूबेहूबकरणाची कला न राहता पेंटिंगप्रमाणे स्वायत्त कला झाली पाहिजे हा त्याचा ध्यास होता आणि फोटो काढताना तो नेहमीच फोटोला पेंटिंग बनवण्याचा भावनेने पछाडलेला असायचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीबद्दल त्याला आकर्षण होते आणि ग्रिडींग स्टोनहेंजवरचे त्याचे ह्या काळातले काम असामान्य होते त्याने निर्माण केलेली शेड्सची व्हरायटी ह्या काळात क्वचितच कुणाला साधलेली असेल त्याच्या सररियल कामाला त्याकाळी मिळणारा प्रतिसाद अल्प असला तरी त्याचे काम रिव्होल्यूशनरी आहे ह्याची कल्पना आमच्यासारख्या काहींना होती 

संपादक असतानाही त्याने फोटोग्राफीच्या कमर्शियलइतके कलातत्वालाही  प्राधान्य दिले होते त्याच्या भाषेत फाइन आर्ट टचला !

पुढच्या भेटीत आम्ही अध्यात्माकडे वळलो ईश्वरावर त्याचा विश्वास न्हवता ना मोक्षावर पण बहुदा गुण लागला आणि त्याच्यासाठी योग्य मेडिटेशन्स मला शोधायला लागली त्याच्या फोटोग्राफीत अध्यात्म वाढायला लागलं आणि गणपतीतला व शिवामधला त्याचा इंटरेस्ट कमालीचा वाढला हिंदू मायथॉलॉजीला आधुनिक मांडणीत कसे साकारायचे हा एक प्रश्न बनला एकीकडे इंडस्ट्रियल कमर्शियल फोटोग्राफीला कला बनवण्याचा ध्यास आणि दुसरीकडे मिथ्समधील सनातन आदिबंधांचा पाठपुरावा अशी त्याची फोटोग्राफिक वाटचाल सुरु झाली 

तो मरिनड्राइव्हवर रहायचा आणि मी चर्चगेटला जे एस हॉल होस्टेलला रहायला आलो आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या फार गुजराती टाईपचं घरचं खायची इच्छा झाली कि अपवादात्मकवेळा मी त्याच्या घरी जेवायलाही जायचो ह्यानिमित्ताने त्याची आई मला अनेक बारीकसारीक प्रश्न मुलांच्या काळजीपोटी विचारायची आणि मी तिला पॉझिटिव्ह बनवायचो ती गुजरातीत प्रश्न विचारायची आणि मी मराठीत उत्तर द्यायचो त्यामुळे हा एक फार इंटरेस्टिंग संभाषणाचा प्रकार असायचा त्याकाळात सगळी मिस्त्री फॅमिली त्यावेळी चैतन्याने झळझळायची त्यामुळे मजा यायची मला गुजराती शिकवण्याचाही तो प्रयत्न करायचा पण तो फेल गेला त्याला मराठी उत्तम समजायची आणि तो चक्क दादा कोंडकेंचा त्याकाळात फॅन होता 

आणि मग एक दिवस ते घडले मला फ्लॅश आला आणि मी अपघात पाहिला काय घडू शकतं ते मी तपशीलवार गिरीशला सांगितलं दुर्देवाने त्याने ते खूप लाइटली घेतले आणि बातमी आली गिरीशला अपघात झालाय 

सर्व ऑपरेशन्स करूनही त्याला व्हीलचेअर टाळता आली नाही सिंह जायबंदी झाला ह्याकाळात मित्र म्हणून त्याच्याबरोबर राहणं मला गरजेचं वाटत असल्याने त्याने कधीही बोलावलं कि मी जात असे त्याला जास्तीतजास्त पॉझिटिव्ह ठेवत असे हळूहळू त्याने नवीन जगणे स्वीकारले पुढचा प्रश्न होता मी एकटाच राहणार कि बायको मिळणार ? कशी मिळणार ?

हा प्रश्न त्याच्या फॅमिलीलाही पडायला लागला त्याचा भाऊ शरद अमेरिकेला सेटल झाला बहीण बहुदा इंग्लंडला आणि दुसरी बहीण हेमा जर्मनीला ! साहजिकच गिरीशची पार्टनर हा चिंतेचा विषय झाला माझ्या सुदैवाने ह्यावेळचा माझा फ्लॅश पॉझिटिव्ह होता आणि त्याला त्याप्रमाणे जोडीदारीण मिळाली ती मराठी होती 

घरसंसार , इस्टेट आणि त्याने काढलेली शरी फोटोग्राफी अकादमी ह्यांच्यात तो हळूहळू बिझी होत गेला आणि कमर्शियल काम हे केंद्रवर्ती बनत चालले माझ्याही आयुष्यात ज्ञ आली भेटींची संख्या घटली त्याचे काम मात्र येत राहिले अपवादात्मकवेळा त्याने बोलावले तेव्हा मी त्याच्या स्टुडिओत गेलोही . तो आत्ताच्या काळावर खुश न्हवता पूर्वी फोटोग्राफर इमेजमेकर होता आता फोटोशॉपच इमेज मेकर आहे असं तो विषादाने म्हणायचा माझ्या मते इंटरनेट वापरून एक नवी इन्स्टॉलेशन टाईप फोटोग्राफी आपण विकसित करणे हा ह्यावर उपाय आहे त्याला ते पटायचं नाही तो ह्याबाबत मनाने साठोत्तरीवालाच राहिला कॉपी पेस्टचा तो क्रिटिक होता ते योग्यच होते सध्याच्या काळात सर्वच कमर्शियल रूथलेस झालंय फोटोग्राफी त्याला अपवाद न्हवती आयफोन आल्यानंतर टच ऑफ क्रिएटिव्हिटी हरवलीय हे आम्हा दोघांनाही मान्य होते पण त्याचा प्रश्न असा होता कि ह्यात टच ऑफ क्रिएटिव्हिटी कसा द्यायचा ? त्याचा प्रयत्न कायम त्या दिशेने चालायचा आणि हे आवश्यक होतं अर्थात कॉपी पेस्टला कला समजणाऱ्या लोकांच्यात हे पटवणे अवघडच होते 

नंतर एका भेटीत मी माझ्या कविता इंग्लिशमध्ये भाषांतरित करत नाही म्हणून तो चांगलाच उखडला अपना आश्रम छोडके बाहर आओ मियाँ म्हणून त्याने खेच खेच खेचली माझे ह्यावरचे म्हणणे मला काही नोबल बिबल मिळवायचे नाही असं होतं ते त्याला पटलं नाही मग मी दोन वर्षे त्याला भेटलोच नाही मग कल्पनाने पुन्हा बोलावले म्हणून गेलो आता प्रश्न स्टुडिओविषयक आणि त्याने काढलेल्या अकँडमीविषयक होते 

नंतर मलाच अपघात झाला मी गेली नऊ वर्षे कधी बेडरिडन कधी पेनकिलर्स घेऊन लेक्चर्स बीडन असा जगत असल्याने भेटी थांबल्या त्यातच माझी श्रवणशक्ती ऑन ऑफ होत होती त्यामुळे समोर भेटून करणार काय असाच प्रश्न होता 

आणि आता बातमी आली ती थेट मृत्यूची ! गिरीश म्हणायचा जाना तो सबको हैं क्या करके जाओगे ये इम्पॉर्टन्ट हैं । गिरीश त्याच्या पाठीमागे असंख्य अव्वल दर्जाची फोटोचित्रे , विक्रम बावा , जिग्नेश झवेरी सारखे अनेक प्रतिभावान विद्यार्थी सोडून गेलाय जी भारतीय फोटोग्राफीच्या इतिहासात नक्कीच इम्पॉर्टन्ट आहेत ! अलविदा मेरे दोस्त ! बडी जल्दबाजी की मेहरबां जाते जाते !

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, February 14, 2023

 व्हॅलेंटाईन डे नंतर श्रीधर तिळवे नाईक 

भावकेन्द्री कविता लिहिणे म्हणजे फक्त रोमँटिक कविता लिहिणे न्हवे प्रबोधनकाळातील भावकेन्द्री कविता रोमँटिसिझमच्या रूपाने अवतरली पण त्याच्याही आधी भावकेन्द्री कविता लिहिली जात होतीच गाथासप्तशतीत कित्येक गाथा ह्या भावकेन्द्री आहेत पण मराठी अभिरुचीला हे समजवणार कोण परिणामी व्हॅलेंटाईन डे ला रोमँटिक कवितेचा महापूर ! वास्तविक आधुनिक भावकेन्द्री कविता कशी लिहायची ह्याचे प्रात्यक्षिक चार्ल्स बोदलेयरने आणि उत्तराधुनिक भावकविता कशी लिहायची हे ऑकटोविया पाझने दाखवून दिल्यावर (पाझच्या प्रभावाखाली येऊनच दिलीप चित्रे वेगळे लिहतात ) किमान मराठी कवींनी तिथपर्यंत तरी यायला हवं होतं पण हे झालं नाही बायका अजूनही रोमँटिसिझमला भुलतात म्हणून हे होतं का ? (पुरुषांचं मला माहीत नाही ते बायकाच सांगू शकतील ) वास्तविक स्वतःच्या प्रेमसंबंधाकडे आणि त्यातील गुंतागुंतीकडे नीट पाहिलं तरी गोष्टी साफ व्हाव्यात इमोशनल होण्याचा अर्थ रोमँटिक होणेच असतो असं नाही अनेकदा रोमँटिक पिंडाचे लोक डॅम्बीस असतात हा माझा अनुभव आहे भावनांच्या आधारे इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि आणि त्याही पुढे जाऊन इमोशनल अत्याचार असंही घडलेलं दिसतं अनेकदा रोमॅंटिसिझमला बळी पडणारे इमोशनल फूल्सही खूप असतात 

भावकेन्द्री असण्याचा खरा अर्थ प्रेम आणि करुणा केंद्रवर्ती ठेवून दुसऱ्याला सेन्सिटिव्हली समजून घेणे , शृंगारिक प्रेमात पडल्यावर स्वातंत्र्याचा एक हिस्सा गमवावा लागतो तो गमावण्याची तयारी ठेवणे , एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे वेळप्रसंगी त्यासाठी कठोर होणे (विशेषतः ह्यात आहार येतो मेडीकॅलिटी येते  ) असा आहे डायबेटीस झालेल्या पार्टनरला प्रेमाने साखरी केक खायला घालणे हे प्रेम न्हवे तर पार्टनरबद्दल निष्काळजीपणा दर्शवतं आणि निष्काळजीपणा करुणेच्या अभावातून येतो 

बाकी मोठमोठ्या गप्पा हाणून चंद्र तारे वैग्रे तोडायची कल्पनाशक्ती अभिव्यक्त करण्याला प्रेम म्हणण्याचे स्वातंत्र्य आहेच लगे रहो रोमँटिक भाई और बहनो 

श्रीधर तिळवे नाईक 



Sunday, August 7, 2022

 पुन्हा एकदा सौष्ठव पण डिजटल श्रीधर तिळवे नाईक 

माणूस मरणाच्या दारात असताना त्याला स्वतःची उरलेली कर्तव्ये दिसत असतात ह्याला मी अपवाद न्हवतो  साहजिकच इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात बाकी असलेली माझी कामे मला दिसायला लागली साहित्याच्या क्षेत्रात दशखंडी तिळवे हा नितीन वाघ व विनायक येवले ह्यांनी डिझाईन केलेला प्रकल्प टाईप व  प्रकाशित करणे धर्म व अर्थ ह्या कादंबऱ्या टाईप व प्रकाशित करणे चौथ्या नवतेच्या मांडणीच्या उरलेल्या जागा भरणे आणि सौष्ठवचे अंक इंटरनेट अर्काइव्जवर डिजीटाईझ करणे वैग्रे 

अनियतकालिकांनी आपली  साईझ व नियमितता नियतकालिकासारखी नियमित ठेवू नये छोटा धमाका करावा व गायब व्हावे हे माझे अनियतकालिकांच्याबद्दल तत्व ! साहजिकच मी जेव्हा असे काही लेखन माझ्या कडे आले तेव्हाच अंक काढला अंक नियमित काढायला गेलात कि साहित्यही पाट्या टाकल्यासारखं वाट्याला येते  म्हणजे मन्या जोशींच्या मला आवडलेल्या २४ कविताच मी घेतल्या त्यावेळी तो फारसा माहीतच न्हवता भुजंगची स्वातंत्र्याचं गाणं हीच कविता मी घेतली अभिजित देशपांडेचे नव्वदनंतरच्या साहित्यव्यवहारावर प्रकाश टाकणारे लेख घेतले ज्ञानदाच्या रोमँटिसिझममधून बाहेर पडलेल्या कविताच मी घेतल्या मंगेश काळेला शक्तिपाताचे सूत्र मध्ये आवाज सापडला असं वाटलं तेव्हाच तो सौष्ठवमध्ये आला हेमंत दिवटे हा तर माझा सहकारी पण त्याच्याही कविता आणि इंटरव्यू थांबताच येत नाही ही त्याचा आवाज अधोरेखित करणारी कविता आल्यावरच सौष्ठव मध्ये आला 

साठोत्तरीचे साहित्य घ्यायचे नाही ह्यावर मी ठाम होतो आणि मला अनेकदा वचन देऊनही नव्या लोकांनी साहित्य दिलं नाही मग रिकाम्या जागा भराव्यात तसा मी अंक माझ्या समीक्षेने भरला मला महत्वाच्या वाटणाऱ्या समकालीनांच्यापैकी सलील वाघ , हेमंत दिवटे , मंगेश काळे , सचिन केतकर ह्यांचे इंटरव्यू आले अभिजीत देशपांडे ,मन्या जोशी व नितीन रिंढे ह्यांचे राहून गेले पण सौष्ठवचा पॅटर्न नंतर हेमंत दिवटेने अभिधानानंतरमध्ये अधिक व्यापक करून इंटरव्यू घेतले आणि एका अर्थाने हे मिशन पुरे झाले नवीन पिढीत संतोष पवार , नितीन वाघ ,  प्रणव सखदेव , ओंकार कुलकर्णी , स्वप्नील वैग्रेंचे असे इंटरव्यू आले पाहिजेत असं वाटतं भुजंग व अरुण काळेला सुरवातीला  चौथी नवता अमान्य होती पण नंतर विचार करावा लागेल असं त्यांना वाटायला लागलं भुजंग आणि मी तो माझ्या हॉस्टलवर आला कि हमखास भेटायचो जगभरच्या आदिवासी साहित्यावर आमच्यात चर्चा व्हायच्या आदिवासी मौखिक साहित्याचे तालन हा आम्हा दोघांच्याही आस्थेचा विषय त्या अंगाने हा इंटरव्यू घ्यायचा वैग्रे खूप चालायचं पण ते घडलं नाही 

मंगेश बनसोड आल्हाद भावसार हे मित्र कायमच सोबत होते मंगेश सहसंपादक होता माझे जे एस हॉलचे महेश म्हात्रें के  श्यामसुंदर ह्यांच्यासारखे हॉस्टेलमेट्स सौष्ठवच्या कायमच मागे होते के श्यामसुंदरचे लेबर्स व लेबर ऍक्ट वरचे काम त्यावेळी सुरु झाले होते जे मला महत्वाचे वाटत होते त्यावर सौष्ठवचा एक इंग्रजी अंक काढायचा प्लॅन होता 

सौष्ठवचा लोगो हा आशुतोष आपटेने तयार केला होता अविनाश धर्माधिकारी ह्यांनी सौष्ठवला जी जागा दिली त्याबद्दल मी कायमच ऋणी राहीन त्याकाळात ते पंतप्रधान किमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटायचे एव्हढी त्यांची पात्रता आहे असं वाटायचं आणि आजही वाटते त्यांना किमान केंद्रात मोदींनी घ्यायला हवं होतं त्यांच्या कित्येक सहकाऱ्यांच्यापेक्षा धर्माधिकारी उजवे आहेत असो भाजपमध्ये टॅलेंट अडवण्याची आणि हलक्या दर्जाची माणसे उंच उडवण्याची एक नवी रीत १९९७ नंतर उदयाला आली आहे धर्माधिकारी त्याचे बळी ठरले पुन्हा असो 

ह्या काळात धर्माधिकारींची  राईट टू इन्फर्मेशन ऍक्टवरची चळवळ सुरु झाली होती जी चौथ्या नवतेच्या दृष्टीने मला फार  महत्वाची वाटत होती  त्यांच्याप्रमाणे आम्हा सर्वांनाच त्यावेळी अण्णा हजारे काही करतील (१९९९ चा काळ )असं वाटत होतं पुढं त्यांनी आंदोलन राष्ट्रीय पातळीवर न्हेलंही पण ते ज्या तऱ्हेने विस्कळीत होत गेलं ते हादरवणारं होतं त्यांचं आंदोलन भाजप स्पॉन्सर्ड होतं वैग्रे बकवास आहे भाजपने ह्या आंदोलनाचा वापर काँग्रेसची सत्ता  संपवण्यासाठी केला एव्हढंच 

धर्माधिकारांच्यामुळेच कीर्तीकुमार  शिंदे , मंदार फणसे , अद्वैत मेहता , राहुल सरवटे असे सुरवातीला सहकारी पण नंतर उत्तम मित्र झालेले लोक ह्याकाळात मिळाले तेराव्या अंकात चक्क राहुल सरवटे व मंदार फणसेची कविता होती हे आता इंटरेस्टिंग वाटते मंदारने नोबल पारितोषिक विजेत्या विस्साव शिंबोस्कीचे भाषणही एका अंकासाठी भाषांतरित केले होते  

माझी विद्यार्थिनी पूजा मून हिच्या सहकार्याने सौष्ठवचे डिजिटाइझ्ड करण्याचे काम पूर्ण झाले हे काम करताना जाणवलेल्या काही गोष्टी विचित्र होत्या म्हणजे मन्या जोशीवरचा अंक हा फक्त त्याच्यावरच आहे हे आता कळलं ह्या अंकाला अभिजित देशपांडेची समीक्षा मिळती तर मजा आली असती  दोन अंक तर कुठं गायब झाले  कुणास ठाऊक ? साहित्यात हिशेब ठेवणे माझ्या बेबंद स्वभावात नाही त्यामुळे माझ्या हजारो  कविता जशा माझ्याकडे चालून आल्या तशे हे अंकही चालून येतील असं म्हणायचं 

सौष्ठवचं काम चौथ्या नवतेचा धमाका करणं हे होतं ते झालं शंकर सारडांनी दैनिक पुढारीमधील एका लेखात प्रस्थापितांच्यात ह्या अंकाने काय झालं होतं ते सांगितलं आहे महेश म्हात्रेने सकाळमध्ये माझा त्यामुळेच इंटरव्यू घेतला होता व आश्चर्यकारकरित्या अरुण म्हात्रे ह्याने प्रस्थापित लोकांची बाजू घेऊन सकाळमध्ये माझा प्रतिवाद केला होता ह्या धमाक्यामुळेच मला शोधत हेमंत दिवटे होस्टेलवर आला मी सौष्ठवचा पहिला अंक ९ फेब्रुवारी १९९३ ला काढला त्याच्यानंतर त्याने अभिधाचा गझल विशेषांक काढला होता पण सौष्ठवचा धमाका झाला आणि हा आला त्या काळात तो गझल विशेषांक काढण्याइतपत रोमँटिक होता पण नंतर बदलला त्याने संपादकपदाची ऑफर दिली मी ती स्वीकारली व  अभिधात गेलो खरेतर त्याने नाव बदलूया असं सांगितलं होतं मी ते ऐकायला हवं होतं असो आम्ही मग दिलीप चित्रे विशेषांक चौथी नवता विशेषांक काढले मात्र एका अंकानंतर जे काही झालं ते अनपेक्षित होतं त्यावर पुढे कधीतरी 

कुठल्याही नवतेचा सहसंवेदनशीलतेमुळे एक गोतावळा तयार होतोच त्यातून वाचायचे कसे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी दुरावा ठेवण्याचे धोरण स्वीकारून सौष्ठवचा गोतावळा होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि ती यशस्वीही झाली मात्र इमोशनल बॉण्ड्स आजही ताजे आहेत 

मागच्या नवतेतले लोक तुम्ही आमच्याशी जुळवून घ्या असे सांगतच असतात मलाही नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा परिसंवादात बोलावले गेले एका बाजूला राजन गवस व दुसऱ्या बाजूला मी होतो राजनने देशीवादाचा कट्टर पुरस्कार केला आणि मीही त्याला अनुमोदन द्यावी अशी अपेक्षा असताना मी देशीवाद्यांच्या साहित्य संमेलनात देशीवादावर हल्ला बोल केला परिणामी देशीवादी भडकले व मला शंका आहे कि पॉप्युलर प्रकाशनातील माझ्या पुस्तकांचे प्रकाशन लांबले जे काही पुस्तकांबाबत अजूनही लांबलेलेच आहे. पुढे हेमंत दिवटेमुळे आमच्या पिढीचे अभिधानानंतर प्रकाशनच सुरु झाले  

काहीवेळा आरोप होणे अटळ असते ते माझ्यावरही झाले म्हणजे किशोर कदम मला तू साहित्य क्षेत्रातील शरद पवार आहे असं म्हणायचा (अलीकडे तो मला साहित्यक्षेत्रातील अमित शहा म्हणतो ) मंगेश बनसोडच्या संपादनाखाली आम्ही दलित ह्या शब्दाची व्याप्ती वाढवणाऱ्या अंकाची निर्मिती केली तेव्हाही ही व्याप्ती वाढवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्न केला गेला सर्वात जास्त आरोप भुजंग मेश्राम करायचा मी कधी अशा आरोपांच्याकडे लक्ष दिलं नाही माझा आग्रह कुणी डावलला नाही अगदी भुजंग मेश्रामसारखा नाठाळही मी समोर असल्यावर मला विचारल्याशिवाय दारू स्वतःच्या ग्लासात ओतायचा नाही (एकदा त्याची मी दोन तास अडवून चांगलीच पंचाईत केली होती )मात्र मीही फालतू दुराग्रह धरले नाहीत आपण आपलं काम करत रहावं आज ना उद्या तुमचं काम बोलेलच अशी माझी धारणा होती 

सौष्ठवचं बंद पडणं अपरिहार्य होतं मी राहुल सरवटेकडे संपादन दिल्यावर त्याला कोलंबिया विद्यापीठाची ऑफर आली मला जोशी कि कांबळेची ऑफर आली मंगेश बनसोड स्वतःच्या परिस्थितीला मॅनेज करण्यात दंग होता आल्हाद भावसारने मुंबई सोडली होती आणि कीर्ती शिंदेला स्वतःची आयडेंटिटी मेंटेन करायची होती त्यामुळे संपादन चालवणार कोण ? शिवाय कीर्तीने अंक काढण्यापेक्षा पुस्तकप्रकाशन व पुस्तक दुकान चालवणे हे महत्वाचे आहे असा युक्तिवाद केला व तो मला पटला हा युक्तिवाद प्रमाण मानून कीर्तीने नवता प्रकाशन चालू केले व दहिसरमध्ये  ग्रंथदालनही !त्यातून नितीन वाघ सारखे काही लेखक पुढे आणले गेले आता तर सौष्ठव अभिधाची पहिली पिढी थेट अभ्यासक्रमात दाखल झाली त्यामुळे बंड करणे न्हवे तर आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची वाट पाहणे अपरिहार्य झाले आहे  

प्रत्येक संपादकाला संपादकीय लिहायला लागतात तशी मीही लिहिली त्यातली काही आजही रिलेव्हन्ट वाटतात 

मेडीटेशनची हुक्की आली कि पळ काढणाऱ्या व त्यामुळं झक्की वाटणाऱ्या पण वचन व वेळ पाळण्याबाबत आग्रही व बुद्धी पक्की असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला इतक्या साऱ्या लोकांनी झेललं कसं असाच प्रश्न आता पडतो . एकंदरच भारतीय संस्कृती झक्की माणसांना व चक्कीत जाळ असणाऱ्या व करणाऱ्या माणसांना पेलण्यात व पचवण्यात निपुण आहे असं म्हणायचं . पुन्हा तिसऱ्यांदा असो . (चिन्हकीत असो म्हणजे पूर्णविराम नाही पण पूर्णविराम दाखवावा लागतो अशी पॉलिटिकली करेक्टनेस  प्रोजेक्ट करणारी स्थिती )

श्रीधर तिळवे नाईक 


 




Saturday, June 18, 2022

 पंचांग श्रीधर तिळवे 

काल अकस्मातपणे शैव पुरोहितांच्या प्रतिनिधींचा फोन आला गेली कित्येक दशके मी शैव कॅलेंडरची व पंचांगाची संकल्पना मांडतोय आणि मान्सून गेल्या काही वर्षात केरळात १० ते १५ जून व महाराष्ट्रात १५ जून ते २१ जून ह्या दरम्यान येतोय हे सांगतोय व शेतकऱ्यांनी आपले हिशेब ह्या अंगाने करावेत असं सांगतोय किमान ह्या दिशेने विचार व्हावा अशी मांडणी करतोय 

पूर्वी वळवाचा पाऊस १५ मेच्या आसपास यायचा तो आता २८ मे ते ६ जून दरम्यान येतोय आणि त्यालाच मान्सून समजण्याची चूक होतीये त्या अंगाने गेली दोन वर्षे निरीक्षणे करून झाल्यावर आता तुमच्या संकल्पनेवर काम करूया अशी सूचना आलीये जर ह्या अंगाने वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांग तयार झाले तर ते हवे आहे मी श बा दीक्षितापासून लोकमान्य टिळकांच्या पर्यंत अनेकांचे संदर्भ देऊन ह्याबाबत आर्यांच्या नेमक्या कुठे चुका झाल्यात त्या पाहून व दुरुस्त करून  त्या अंगाने काम करूया अशी सूचना दिलीये जी आता स्वीकारण्यात आलीये मीच बरोबर अशी माझी भूमिका नाही पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे 

भारतीय शैव हे कायमच पंचांगाचे मास्टर लोक होते पण आठव्या शतकात शैवांची मागपडणी (पीछेहाट) सुरु झाली आणि त्याचा भारतावर विपरीत परिणाम झाला पंचांग हा शहरवासीयांना फक्त मुहूर्ताचा विषय असतो पण गावात शेतीविषयीची कामे त्यावर अवलंबून असतात असो 

आर्य पुरोहितांना जे करायचंय ते करू द्या पण शैव पुरोहितांनी व शैवांनी मोक्ष , विज्ञान, चिन्हविज्ञान तंत्रज्ञान  व चिन्हतंत्रज्ञान ह्या अंगानेच पुढे गेले पाहिजे हे मी ठामपणे मांडतो आहेच  हळूहळू का होईना पण ह्याबाबत जागृती होते आहे हे चांगले लक्षण आहे शैवांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञानातले तीन चार नोबल लॉरेंट निर्माण होत नाहीत तोवर काही खरं नाही मोक्षदर्शन हा आरंभ असू शकतो पण मुख्य काम विज्ञान चिन्हविज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्याच क्षेत्रात होत असते 

श्रीधर तिळवे नाईक 

तू भेटलास तेव्हा स्थिती थोडी गंभीर होती शैलेन्द्रांच्यामुळे डॉक्टरांकडे गेलो पल्स प्रचंड झाल्याने हे झालंय असं त्यांचं म्हणणं आहे आता थोडा बरा आहे बोलतांना कमी वेदना होतायत 

शैवांची कामं मुख्यतः मौखिक असल्यानेच गप्प आहोत आर्यभट वैग्रे शैवच होते व त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत फलज्योतिषशास्त्रात महेश्वर , काशिनाथ ,वराहमिहीर अशांची मते मिळतात ती पंचांगाशिवाय अस्तित्वात आली असतील काय ? तुला असं म्हणायचंय का गावातला गुरव किंवा जंगम किंवा शैव ब्राम्हण पूर्वी अंदाजपंचे पेरण्याचे मुहूर्त सांगायचे ? माझ्या आजोबांनाच मी हे मुहूर्त काढताना बघितले आहे . ज्योतिष आणि फलज्योतिष हे अनेकदा पूर्वी एकच मानले जायचे अगदी न्यूटनसुद्धा फलज्योतिष अभ्यासायचा  हे तुला माहीत नाही का ? ह्या देशात जसे बौद्धांचे ग्रंथ जाळले गेले तसे शैवांचेही ! श्रीलंका ,चीन , तिबेट मध्ये बौद्ध धर्मग्रंथ मिळाले नसते तर भारतात बौद्धांकडे  काय घंटा पुरावे होते ? आता आता व्हिएतनाममध्ये शैव राजवट असल्याचे आणि तिला नंतर बौद्ध व वैष्णवांनी रिप्लेस केल्याचे पुढे येते आहे . हळूहळू पुरावे पुढे येतीलच पण पुराव्याची वाट पहात आम्ही आता काम करू नये असं तुला म्हणायचंय का ?

ज्याला आसुरी बरं वाटून घ्यायचे असते तो आसुरी बरं वाटून घेतो 

जिथे गोतम बुद्धच कपिल ह्या शैवाच्या खांद्यावर बसलेला आहे तिथे बौद्ध ज्ञानाविषयी काय बोलावे ? ज्याला बौद्ध ज्ञान म्हंटले जाते तिथे तेच मुळी शैवांच्यापासून सुरु होते सूर आर्यांचे ओरिजनल दर्शन एकच मीमांसा बाकी सगळी शैवांची उसनवारी ! चायनीज प्रवासी बौद्ध धर्म स्वीकारूनच आले होते ते बौद्ध धर्माविषयीच आणि बौद्ध धर्माच्या बाजूने बोलणार व बौद्ध ग्रंथ न्हेणार जे नैसर्गिकच आहे . शैव प्रवासी आले असते तर त्यांनी शैव ग्रंथ न्हेले असते बाकी पुराव्याची गोष्ट तर त्यासाठी शैव ग्रंथ वाचायला हवेत 

देशीवादाचा आरोप विनोदी आहे मुळात शंकरानी सांगितलेला शैव असो कि बुद्धाचा बौद्ध हे धम्मच मुळात मार्गी आहेत पंचाग ही गोष्टच मुळात मार्गी आहे जे जे समस्त मानवजातीसाठी सांगितले जाते ते ते मार्गीच असते शंकराच्या काळात समुद्र पर्यटन करतील अशी जहाजे न्हवती त्यामुळे शंकर कधीही जहाजात बसलेला दिसत नाही त्यामुळे भारतीय उपखंड हेच जग होते आणि त्या प्रदेशात शैव धम्म पसरवण्याचा आदेश दिला गेला गौतम बुद्धाच्या काळात आशिया खंड हा जग होता म्हणून आशियाभर बौद्ध धर्म पसरवण्याचा त्याने आदेश दिला ख्रिश्चन व इस्लामच्या काळात आफ्रिका आशिया युरोप माहीत झाले होते म्हणून ह्यांनी त्रिखंड व्यापले पुढे दोन्ही अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंड माहिती झाले म्हणून हेही जगात आले आठव्या शतकानंतर शैव देशीवादी झाले आणि प्रत्याभिज्ञा स्पंद दर्शन काश्मिरी शैवागम झाले सिद्धांत दर्शन तामिळ सिद्ध दर्शन झाले ह्याउलट ह्या काळात शंकराचार्यांनी मार्गी होत वेदांत भारतभर न्हेला देशीवादाने भारताचे विशेषतः बहुजन समाजाचे कायमच नुकसान केले आहे 


थोडक्यात कपिलच्या खांद्यावर गौतम बुद्ध असतो आणि आंबेडकरांनीच हे मांडलेलं असतं मग बुद्ध मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्याने शैव उत्पादक वर्गाने बनवलेल्या शंकराच्या मूर्त्यांना बुद्धाच्या मुर्त्या म्हणायचे असते आणि शैवांच्या शिवभक्तीनुसार बुद्धाची भक्ती सुरु करून महायान पसरावयाचे असते शैवांच्या तंत्राला आत्मसात करून पुढचे वज्रयान रचायचे असते शैवांच्यावर टीका करणाऱ्यांना शैव ग्रंथ वा दर्शने वाचण्याची तसदी घ्यायची नसते शैव मंदिरांची आर्किटेक्ट्स ही जिवंत पुरावे असतानाही शैवांना अक्कल नाही असे भासवायचे असते मूळ मुद्द्यावर(इथे मान्सूनच्या तारखा का चुकतायत हा मुद्दा आहे ) भाष्य न करता कुठलेतरी तळातले वाक्य उचलून वादविवादाची लांबड लावायची असते 

आणि मूळ पोस्टमध्ये उद्युक्त केलेले लेखक चर्चेत न आणता कॉमेंट्स पास करायच्या असतात 


एक बौद्ध पंडित  सिद्धाला  म्हणाला ,"मी तुझ्यापेक्षा जास्त जाणतो "

सिद्ध म्हणाला ,"हो "


प्रकृती बिघडलीये प्रज्ञा ठणठणीत आहे मानसिक ताण इमॅजिनेशन्स असतात ते अस्तित्वात नाहीत आपुलकीबद्दल धन्यवाद मित्रवर्य 

सर , पंचांग म्हणजे पाच अंगे ती पुढीलप्रमाणे 

१ ग्रहगती व ग्रहस्थिती 

२ अवकाशबिंदू जसा अयनबिंदू 

३ नक्षत्रस्थिती (ग्रीक लोकांच्यात राशी )

४ तिथी , पक्ष व वार 

५ वर्ष 

पंचांग ऍस्ट्रॉनॉमी ज्याला भारतात ज्योतिष म्हणतात त्याचा भाग आहे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे पूर्ण वेगळे आहे व मी मागेच इथे म्हंटल्याप्रमाणे त्याला करमणूक म्हणूनच स्थान द्यावे पाश्चात्य देशात भविष्याचा तार्किक अभ्यास करण्याच्या शाखेला फ्यूचरॉलॉजी म्हणतात त्याला विज्ञान म्हणावे कि नाही किंवा त्याला विज्ञानाचे स्वरूप कसे द्यावे त्यात पूर्वसूचनचा  समावेश करावा कि नाही हा वाद सतत चालत असतो पण त्याचा फायदा असा असतो कि माणसे भविष्यकेंद्री विचार करतात केवळ इतिहासात गोते खात बसत नाहीत मला ह्याच शाखेत बॅचलर व मास्टर डिग्री मिळवायची होती पण भारतात त्यावेळी कुठल्याच विद्यापीठात ही शाखा शिकवली जात न्हवती आणि युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा पैसा माझ्या बापाकडे वा माझ्याकडे न्हवता पुढे १९९० साली तामिळनाडू मध्ये ह्या शाखेचा विचार सुरु झाला मात्र मी स्वतःच्या जीवावर ह्या शाखेचा स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे अभ्यास करत राहिलो कम्युनिझमच्या इतिहासात फक्त चायनाने ह्या शाखेचा वापर १९७२ पासून करायला सुरवात केली आहे बाकी देशांनी तो केला असता तर कदाचित तिथला कम्युनिझम वाचला असता बाकी मार्क्सने दिलेल्या प्रेडीक्शन्सचा विचार आम्ही आर्थिक फ्यूचरॉलॉजीत अधूनमधून करत असतो 

राहता राहिली गोष्ट जगबुडीची ! तर जगबुडीचा मला अनुभव नाही मी जगबुडीविषयी फक्त कथा , दंतकथा ,  कादंबऱ्यांतून सिनेमातून ऐकून व पाहून आहे त्यामुळे जगबुडी होणार कि नाही मला माहित नाही किंवा होणार असेल तर कधी होणार ह्याविषयी मी काहीच सांगू शकणार नाही मला वाटतं तुम्ही हा प्रश्न जगबुडीतज्ञानां विचारावा 

तूर्तास शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या वाया जाताहेत तर त्याला आत्ताचे पंचांग किंवा हवामानशास्त्र जबाबदार आहे का हा माझ्या कन्सर्नचा विषय आहे आणि विज्ञानांत वैयक्तिक मतांना काहीच किंमत नसते त्यामुळे वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांगाचा पुनर्विचार करावा का इतकाच प्रश्न मी चर्चेला घेतला आहे एक पेरणी वाया जाणे म्हणजे शेतकऱ्याचे किती श्रम व धन वाया हे आपण कम्युनिस्ट असल्याने सांगण्याची गरज नाही . 





पंचांग म्हणजे कुणी मुहूर्त सांगणारा किंवा जगबुडी सांगणारा ब्राम्हण असा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे सद्या आपण ख्रिश्चन पंचांग आणि ह्या पंचांगानुसार तयार झालेले कॅलेंडर वापरतो आणि आपल्या ते गावीही नाही . अपवाद काही  इस्लामिक देश ते मात्र इस्लामिक पंचांग वापरतात नासाने स्वतःचे पंचांग डिक्लेअर केलेले आहे पण अजून तरी कुठल्या देशाने ते शास्त्रशुद्ध असूनही स्वीकारलेले नाही असो इथे पंचांग म्हणजे काय ते सांगतो आहे 

ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेलं लिखाण )

Thursday, March 10, 2022

 अंदाजानुसार निकाल लागले गोव्यात आपला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असाच अंदाज होता सुरेलला जास्तीत जास्त १२ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळणार नाहीत हे आधीच माहीत होते उत्तर प्रदेशात २७५ सीट्स  भाजप प्लसला  म्हंटल्याने शिव्या खाल्ल्या होत्या (अशाच शिव्या शरद पवारांना विधानसभेत दिल्या तेव्हा खाल्ल्या होत्या पण अंदाज अचूक झाल्यावर शांतता पसरली )पण प्रत्यक्ष निकाल लागल्यावर सॉरी आलं 

पंजाबमध्येही अपेक्षित निकाल लागला प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात आप का प्रसार पावत नाही ?मीडियामध्ये बोललं कि पक्षाचा प्रचार होतो अशी समजूत आहे का ?

असो माझ्यादृष्टीने धार्मिक आणि प्रबोधनीक पुरोगामी दोन्ही प्रकार आऊटडेटेड आहेत उत्तराधुनिक पक्ष अस्तित्वात नाही त्याचा पुरेपूर फायदा भाजपला मिळतो आहे चौथ्या नवतेचा एक पक्ष सोडा साधा राजकीय तुकडा पण अस्तित्वात नाही असो 

श्रीधर तिळवे नाईक 

हिंदुत्ववाद किमान १६० वर्षे जुना आहे हे प्रथम लक्ष्यात घ्या श्रीधर तिळवे 

सगळे काव्यसंग्रह आणि अडा हॉका बाणासुना ही कादंबरी सोल्ड आऊट आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या काव्यसंग्रहाची दुसरी बृहद आवृत्ती अलीकडे हस्ताक्षर प्रकाशनाने प्रकाशित केली आहे 

Thursday, February 17, 2022

 डिस्को लहर गेली श्रीधर तिळवे नाईक 

भप्पी लाहिरी गेले आमच्या पिढीचा एक वादग्रस्त संगीतकार गेला आमची पिढी नाचायला लागली ती भप्पीदांच्या सुरक्षामधल्या मौसम है गानेका पासून मिथुन चक्रबर्तीला त्यांचा आवाज एकदम फिट्ट बसायचा आणि त्याच्या डिस्कोला वाव देणारे त्यांचे संगीत होते ज्याला फोर ऑन द फ्लोर बिट्स म्हणतात त्याचा भारतीय शैलीत वापर करणारे ते पहिले संगीतकार होते हा बिट त्यांच्याआधी आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी ह्यांनी वापरला होता पण त्याला पॉप्युलर बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पुढे डिस्को म्हणून पुढे आलेला हा संगीतप्रकार भप्पीदांनी प्रचंड हाताळला किंबहुना आर डी पेक्षा वेगळी ओळख ह्या वापरामुळेच निर्माण झाली 

जर तिशोत्तरी जॅझची असेल साठोत्तरी रॉकची असेल तर आमची ऐंशोत्तरी ही डिस्कोची होती असं म्हणायला हरकत नाही सॅटरडे नाईट फिवर हा १९७७ चा चित्रपट माझ्या बालपणावर लॉन्ग  टाइम ठसा उमटवून गेला होता आणि माझी डिस्कोशी ओळख इथूनच सुरु झाली 

पुढे ए आर रेहमानपासून जे संगीताचे डिजिटल युग आले त्याची पायाभरणी भप्पीदांनी डिस्को मधून केली नैसर्गिक वाद्यांच्याकडून मॅनमेड वाद्यांच्याकडे सुरु झालेल्या प्रवासात ह्या ऐंशोत्तरी संगीताचा प्रचंड वाटा होता इलेक्ट्रिक पियानो आणि सिंथेसायझर ह्यांनी संगीताचे रूप पालटायला ह्याच काळात सुरवात केली प्रोग्रॅम्ड म्युझिकचा हा आरंभ होता मात्र ह्या बदलांची घनता आणि गहनता समजून घेणे भप्पीदांना जमले नाही ही त्यांची मर्यादा होती त्याऐवजी आर डी पासून वेगळी आयडेंटिटी निर्माण करणे आणि ह्या बदलाचा उथळपणे कमर्शियल वापर करणे ह्याकडे त्यांचा कल होता 

आर डी बर्मनने ओ पी नय्यरला चॅलेंज करून स्वतःचे वेगळे म्युझिक प्रस्थापित केले आणि आरडीला फॉलो करणारे जतीन ललित , आनंद मिलिंद असे एक स्कूल निर्माण झाले भप्पीदा हे ह्या स्कूलमधले पहिले विद्यार्थी त्यांचे वडील अपरेश मुखर्जी बंग संगीतकार होते आणि लता मंगेशकरांचे त्यांच्याकडे येणे जाणे होते (त्यांनी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती ) किशोरकुमार अशोककुमार त्यांचे मामा होते साहजिकच घरी संगीताचा माहोल होता मुखर्जी फॅमिली ही इंडस्ट्रीतील एक मोठी फॅमिली (ह्या फॅमिलीतील सुजॉय मुखर्जी हा माझा एकेकाळी मित्र होता त्याच्यामुळे त्याचे वडील जॉय मुखर्जीचा परिचय झाला होता ) होती आणि तिचा त्यांना पाठिंबा होता मात्र ह्या फॅमिलीने उचलेगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही आणि भप्पीदाला कधीकधी ह्यावरून ऐकवले जाई त्यामुळेच ओरिजिनल धून निर्माण करण्याची त्यांची तडस शाबूत राहिली 

सुरवातीला त्यांनी आरडीच्या शैलीत संगीत दिले त्यांच्या दादू ह्या बंगाली फिल्ममधे लता मंगेशकर गायल्या तर  किशोरमामाने (किशोरकुमार ) चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे अजरामर गाणे गायिले आणि त्यांची घौडदौड सुरु झाली ह्याचवेळी आप की  खातीर  साठी बम्बयसे आया मेरा दोस्त गाजले 

चलते चलते हा चित्रपट नायक विशाल आनंद देव आनंदची भुरटी नक्कल मारत होता त्यामुळे फ्लॉप झाला तरी त्यातील गाणी गाजली ह्यातले प्यारमे कभी कभी ऐसा हो जाता है हे भप्पीदांचे ड्युएट माझे ऑल टाइम फेवरीट आहे 

मग सुरक्षा आला ह्यातील संगीत आर डी च्या शैलीत असूनही आर डी पेक्षा वेगळे होते ह्यातील दिल था अकेला अकेला मधुर होते तर मौसम हैं गानेका व गनमास्टर जी नाईन ट्रेन्डसेटर ! भप्पीदांनी मला झटका दिला तो तीन  गाण्यांनी पहिले डिस्को डान्सरमधल्या याद आ रहा तेरा प्यार हे  दर्दभरे गाणे हे दर्दभरे गाणे डान्सिकल फॉर्ममध्ये दर्द पेश करणारे पूर्णपणे वेगळे गाणे होते दुसरे वारदात मधले तू मुझे जानसेभी प्यारा है ने ह्यात नशिलेगिरी होती पण डिस्कोथेकमधली होती तिसरे गाणे सलमा आगाचे होते दिलके अरमान आसूंओमे बह गये सारखे सेमिक्लासिकल गाणे ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी वेगळी इमेज होती भप्पीदांनी त्या इमेजचा अक्षरशः भुगा केला कसम पैदा करनेवालीकी मधले ये रातमें जो मजा हैं  हे गाणे केवळ अभूतपूर्व होते आशा भोसलेंच्या साम्राज्याला ह्या गाण्याने तडा गेला आणि आशा भोसलेंच्यापेक्षाही वेगळ्या आवाजात हस्कीपणा निर्माण करता येतो हे भप्पीदांनी व सलमा आगाने सिद्ध केले (ह्या गाण्याचे  जलवा ४ सारखे व्हर्जन्स ऐकावेत म्हणजे सलमा आगाच्या आवाजाची किंमत कळते शमशाद बेगमच्या स्कूलचा हा आवाज म्हणजे एक नवा व्हर्जन होता आणि तो भप्पीदांनी निर्माण केला होता दुर्देवाने सलमा आगा नंतर मुस्लिम परंपरेत परतली आणि अशी गाणी गाणे तिने बंद केले )ह्या गाण्यात मिथुन डान्स करत न्हवता पण त्याने ड्रम सेट वर जी ऍक्टिंग केली ती झकास होती ह्या गाण्यांच्यात भप्पी गहन होते एक वेगळा साउंड निर्माण करण्याचा सृजनशील प्रयत्न होता ह्याशिवाय मिथुनच्या डिस्को शैलीला पूरक देखा है मैने तुम्हे फिरसे पलटके सारखी आमच्यासारख्या नाचखोर (मराठी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या  ) लोकांना डान्सप्रवण करणारी अनेक गाणी भप्पीदांनी दिली . 

प्रकाश मेहरांना खास कल्याणजी आनंदजी शैलीत त्यांनी नमक हलाल व शराबी मधली गाणी दिली आणि त्यासाठी त्यांना पारितोषिके दिली गेली ही गाणे छान होती पण जहाँ चार यार मिल जाये व इंतेहा हो गयी इंतजारकी(हे थर्ड डिग्री ह्या अलबमची कॉपी केलेले गाणे होते )  ही फक्त  दोन गाणी भप्पीदा टचची होती बाकी सारा मामला कल्याणजी आनंदजीसारखा होता त्यातील मंजिले अपनी जगह व पग घुंगरू बांध मीरा नाची थी गाजली 

बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर आणि ऍक्टर्स अनेकदा संगीतकारांना "ह्या गाण्याची कॉपी करा " म्हणून विनंती करतात अशावेळी नकार दिला तर संपूर्ण चित्रपट हातातून जातो त्यामुळे अनेकदा संगीतकार झक मारत चोऱ्या करतात कधीकधी कॉप्या करण्याचा मोह आवरत नाही भप्पीदा ह्याला अपवाद न्हवते त्यांच्या प्यारा दुश्मन मधील हरी ओम हरी सरळ सरळ इरप्शनची कॉपी होती झुबीझुबी हे मॉडर्न टॉकिंगची कोई यहाँ नाचे नाचे द बगल्स ची मेरे पास आओगे (टारझन ) हे मिडल ऑफ द रोडचे ह्याच चित्रपटातील जिलेले जिलेले ओसीबीसा जिमी जिमी हे ओटवनचे वैग्रे (ही यादी खूप मोठी आहे ) नक्कल होते कथेबाबत सलीम जावेद व संगीताबाबत भप्पी लाहिरी ह्यांनी चोरीला  ऑफिशियल केले त्यांना स्वतःला ह्या चोऱ्या पसंत न्हवत्या असं ते म्हणत पण काळ बदललाय आणि मी हे केले नसते तर टिकलो तर टिकलो नसतो असा त्यांचा दावा होता 

जे अमेरिकेत होते ते बॉलिवूडमध्ये दहा वर्षांनी होते १२ जुलै १९७९ ला अमेरिकेत डिस्को डिमॉलिशन नाईट घडली आणि डिस्को संगीताच्या पतनाला सुरवात झाली आपल्याकडे हे पतन १९९० ला सुरु झाले आणि हळूहळू भप्पीदांचे वर्चस्व संपत गेले ए आर रेहमानने ह्या पिढीला चॅलेंज दिले आणि पुढे साजिद वाजिद विशाल भारद्वाज अमित त्रिवेदी ह्यासारख्या संगीतकारांनी ह्या युगाचे वर्चस्व संपवले 

ह्या काळात साऊथमध्ये इलाया राजा जबरदस्त निर्मिती करत होता त्यामुळे भप्पीदांना क्लासिकल दर्जा प्राप्त झाला नाही पण डिस्को संगीताचे त्यांनी अफलातून भारतीयीकरण केले ह्याबद्दल शंका नाही इलायाने असेंडिंग नोट्स निर्माण करून त्यात जी क्रांती केली तशी कोणतीही क्रांती भप्पीदांना जमली नाही इलायाने ए आर रहमान , युवा शंकर ह्यांच्यासारखे त्यांचे संगीत पुढे न्हेणारे शिष्य निर्माण केले तसंही काही बप्पीदांना जमलं असं दिसत नाही आजसुद्धा भप्पीदांनी जे केले त्याचे मूल्यमापन करणं जड जातं कारण त्यांचे कोणते गाणे चोरी केलेलं निघेल सांगता येत नाही 

आजच्या पिढीला मात्र ते माहिती झाले ते डर्टी पिक्चरमधल्या उ लाला उलाला ह्या गाण्यामुळे ! त्यांचे आमच्या काळात दुर्लक्षित झालेले कलियोको चमन सारखे गाणे अचानक रिमिक्समध्ये हिट झाले ह्याबाबतीत जी केस झाली ती त्यांनी जिंकली . 

एक गोष्ट नक्की त्यांनी आमच्या कुमार वयात एक वेगळा नृत्यप्रधान साउंड दिला आणि आम्हाला मनसोक्त नाचू दिले त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 



Wednesday, February 9, 2022

 माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पाहिलेला पहिला स्टार म्हणजे रमेश देव ! माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर होती ती हिशेबाची ! मी हिशेब करत असतांना ते काहीसे अचंब्याने पाहत होते . मग वडिलांना म्हणाले ," हा वयाच्या मानाने फार फास्ट आहे "

वडील म्हणाले ,"हो '

आमच्या तिळवे भंडारमध्ये ज्या काही लोकांची खाती होती त्यात देव कुटुंबीय होते त्यामुळे मग भेटी होत राहिल्या अभिनेत्यांचे पैसे वरखाली होत असत त्याला रमेश देव अपवाद न्हवते मात्र घरी सर्व सामान नीट पोहचवा अशी त्यांची विनंती असे व वडील ते काम इमान इतबारे करत कारण देव फॅमिलीही बाहेरून येऊन कोल्हापुरात सेटल झालेली त्यामुळे एक इमोशनल बॉण्ड तयार झाला होता . ते मूळचे राजस्थानी होते आणि प्रख्यात जोधपूर पॅलेस त्यांच्या पूर्वजांनी बांधला होता ह्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही इतके त्यांचे मराठीकरण झाले होते 

माझे आईवडील रमेश व सीमा देव (माझ्या आईचे व सीमा देव ह्यांचे दोघांचेही नाव नलिनी होते त्यामुळेही एक बॉण्ड होता ) दोघांचेही फॅन दोघांचे जवळ जवळ सर्वच चित्रपट आम्ही बघितले कधीही दुकानात आले कि साधे सरळ वागायचे बोलायचे मुंबईला सेटल होईतोवर हे चालले पुढेही वर्षातून एखादी चक्कर व्हायची १९८० नंतर सर्व कमी होत गेले पण पुढे अजिंक्य देवची प्रत्येक फिल्म आम्ही पाहिली ते वडिलांच्या आग्रहास्तव !

मुंबईला आलो तेव्हा लिस्टमध्ये रमेश देव होतेच मी फोन केल्यावर ते अजिंक्यला फोन करून ते थेट घरीच ये म्हणाले अजिंक्यला मी फोन करून मी पत्ता घेतला आणि भेटलो मी तिळवेंचा मुलगा आहे म्हंटल्यावर सीमा देव एकदम खुश झाल्या रमेश देवांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली मी त्यांना त्यांच्या शेजारचे अपडेट्स दिले एक जुना माहोल तयार झाला 

पुढे मग अजिंक्यने मला शंकरच्या हिंदुस्थानी ह्या चित्रपटाची रिमेक करायची आहे तू लिहिशील का म्हणून विचारले मला कॉपी करायचा विलक्षण कंटाळा साहजिकच मी प्रयत्न करतो म्हणालो खरा पण माझ्याकडून काही प्रयत्न झाले नाही अजिंक्यच्याही लक्षात आलं असावं बहुदा ! त्याने नाद सोडला आणि नात्यात एक अवघडलेपणा आला 

त्यानंतर मी भेटलो नाही आणि आता थेट वार्ताच आली . एका अत्यंत सज्जन अभिनेत्याचा हा अंत होता मी पुढेही अनेक स्टार्सना भेटलो  पण रमेश देव ह्यांच्याइतका साधा सरळ अभिनेता मी पाहिला नाही त्यांची आनंदमधली भूमिका अनेकांच्या आवडीची पण मला जैसे को तैसा मधला खलनायक अधिक आवडला कारण ते जे न्हवते ते त्यांनी साकार केले होते आनंदमध्ये ते त्यांच्या स्वभावासारखे होते पुढे राजेश खन्नाबरोबर त्यांनी अनेक फिल्म्स केल्या . अभिताभबद्दल त्यांना कौतुक होते आणि आनंदच्या सेटवरचे त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग होते रामपूरका लक्ष्मण सारख्या  काही सुपरहिट फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे राजा परांजपे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले होते ज्यात निरीक्षण, नाट्यशिलता  व अनुसरणाला महत्व असायचे त्यांची पहिली महत्वाची फिल्म आंधळा मागतो एक डोळा ही राजा परांजपे ह्यांचीच होती त्यामुळे ते स्वाभाविक होते १९८० नंतर त्यांच्या अनेक हिंदी फिल्म्स आपटल्या आणि महत्वाच्या लेखक दिग्दर्शकांपासून ते दुरावले मात्र नंतर अचानक त्यांना जाहिरातक्षेत्रात निर्माता म्हणून जबरदस्त यश मिळायला सुरवात झाली आणि ते निर्मितीक्षेत्रात स्थिरावले त्यातूनच पुढे अभिनय देव (दिल्ली बेली )हा एक अफलातून दिग्दर्शक आकाराला आला  

त्यांना थोडी अजिंक्याचीच काळजी होती आणि एक भविष्यावैज्ञानिक म्हणून तो किमान मराठीत तरी यशस्वी अभिनेता होईल अशी मी खात्री दिली होती 

आपली दोन्ही मुलं कलाक्षेत्रात आणण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि ती यशस्वी झाली 

त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 





Sunday, February 6, 2022

 लताबाई गेल्या आणि भवतालावर एक पॉज पसरला बुद्धीच्या आवाक्याबाहेर असलेली त्यांची मधाळ गायकी कायमच आयुष्यात तारे पेरीत मुलायम स्वरप्रकाश प्रकटत करत राहिली जन्मजात गन्धाराचं गूढ कधीच सुटलं नाही दैवी स्वरलयीचं विलक्षण देणं त्यांना लाभलं होतं 

माझा आवडता संगीतकार ओ पी नय्यरने त्यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही तरीही लताबाई तो गेला तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित करत्या झाल्या तर ज्यांचं आयुष्य ओपी मुळं घडलं त्या आशाबाई चुप्प राहिल्या हा फरक बोलका होता त्या हिंदुत्ववादी होत्या आणि त्यांनी ते कधीही लपवलं नाही अलीकडे त्यांना त्यामुळे फार बायस टीका झेलावी लागली त्यांची गायकी हिंदवी होती हिंदुत्ववादी न्हवती ह्याचाही अनेकांना विसर पडला 

हिंदी फिल्मी संगीतात स्त्रीगायकीची सुरैया , शमशाद बेगम , गीता बाली आणि लता मंगेशकर अशी चार घराणी आहेत त्यातील लता मंगेशकर घराण्याच्या त्या आद्य प्रवर्तक गीता बाली घराण्यात नंतर आशा भोसले ही त्यांच्यापेक्षा सरस वारस जन्माला आली तसं लता मंगेशकर घराण्यात झालं नाही आमच्या पिढीत त्यांच्यापेक्षा त्यांच्याच घराण्यातील अनुराधा पौडवाल लोकप्रिय झाल्या आणि नंतर अलका याज्ञीक आणि कविता कृष्णमूर्तींनी आपले राज्य निर्माण केले पण तरीही लताबाईंच्या आसपासही कोणी पोहचू शकल्या नाहीत संगीत देवीकडून मानवी कडे जसं जसं कलायला लागलं तशी आशा भोसलेंची पकड काही काळ वाढली तरी लताबाईंचे साम्राज्य अबाधित राहिले आशा जे गाऊ शकत होत्या त्या स्वरावटी लताबाई सहज तितक्याच मादक गाऊ शकायच्या उदा दो घूंट मुझको पिला दे शराबी किंवा ओ जाने जॉ मात्र ह्या मादकपणातही दैवी स्पर्श लपायचा नाही त्या उलट आशाबाईंचा आवाज कधीही दैवी उंची गाठू शकला नाही त्यामुळेच लताबाई ह्या जगातल्या सर्वोत्तम गायिका आहेत हे ठसत राहिलं दैवी कधीही मानवी होऊ शकतं पण मानवी कधीही दैवी होऊ शकत नाही त्याचे हे उदाहरण होते (अपवाद आशाबाईंनी गायिलेले दिन तैसा रजनी ) लताबाईंची 

१ ये दिल और उनकी निगाहोके साये 

२ रातभी हैं कुछ भिगी भिगी 

३ आजा रे परदेसी 

४ ए दिले नादान 

५ झूम झूम ढलती रात 

६ श्रावणात घन निळा 

७ ऐरणीच्या देवा तुला 

८ कही दीप जले कही दिल 

९ पलभरमे ये क्या हो गया वो मैं गयी 

१० लग जा गले 

११ कोई नहीं है फिरभी हैं मुझको 

१२ आपकी नजरोने समझा 

१३ बेदर्दी बालमा तुझको 

१४ सोलह बरसकि बाली उमरको सलाम 

१५ जब प्यार किया तो डरना क्या 


ही माझ्या आवडीची ! त्यांच्या सुरेलपणावर विश्वकोश बनू शकतो इतके हे सूर अचूक आणि अभिजात होते , मराठी लोकांनी करियर कसे बनवावे ह्याचे धडे त्यांच्याकडून गिरवावे इतकी त्यांची मॅनेजमेंट परफेक्ट होती त्यांच्या व्यवहाराला नाक मुरडणारा मराठी स्वभाव हा खरेतर आऊटडेटेड झालेला स्वभाव आहे त्यापेक्षा बॉलिवूडमध्ये मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या त्या आदर्श होता राजेश खन्नाच्या आशीर्वादचे आणि शाहरुख खानच्या मन्नतचे वाटेल ते नखरे झेलणाऱ्या मराठी लोकांनी लताबाईंच्या प्रभुकुंजचे नखरे मात्र ओव्हररेटेड केले एकंदरच यशस्वीपणाचे मराठीतील बुद्धिवादी लोकांना वावडे आहे कि काय अशीच शंका येते त्यांनी बालपणात सोसलेल्या दारिद्र्याच्या झळा आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिल्या त्यातून त्या बाहेर येत्या तर होत्या त्याहून अधिक दिलदार झाल्या असत्या आणि धनासक्त स्त्रीची इमेज तयार झाली नसती 

साहित्यिकांच्यावर विशेषतः गीतकारांच्यावर मात्र त्यांचे प्रेम होते एल एम स्टुडिओत मी संगीतकार म्हणून प्रथम एंट्री मारली तेव्हा तिथे टांगलेले गीतकारांचे फोटो पाहून काहीसा चकित झालो होतो 

संगीतकार सज्जादवरचे  त्यांचे प्रेम हाही माझ्या कौतुकाचा विषय आहे त्यांनी त्याला आठवणीत ठेवला नसता तर कदाचित तो विस्मरणात गेला असता राज कपूरशी त्यांनी घेतलेला पंगा हा तात्विक नीडरपणा दाखवणारा होता (पुढे असाच पंगा अलिशा चिनॉयने यशराज बरोबर घेतला तेव्हा तिला माघार घ्यावी लागली होती )

अलीकडच्या गीतकारीवर त्या प्रचंड नाराज होत्या त्याचा परिणाम गाण्यांची संख्या कमी होण्यात झाला उच्छंख्रुलपणा त्यांच्या पिंडाला मानवणारा न्हवता वास्तविक ज्या आधुनिकतेतला त्या उच्चंख्रुल समजत त्याच  आधुनिकतेतून  माईकचा शोध लागला नसता तर त्यांच्या नाजूक गायकीला कदाचित मान्यता मिळाली नसती त्या पिंडाने अभिजात रोमँटिकवादी होत्या हेच खरे त्यामुळेच गीतलेखनातील आधुनिकता त्यांना झेपणारी न्हवतीच 

इतिहास आणि क्रिकेट ह्याचे त्यांना वेड होते आणि क्रिकेटला स्टेट्स देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्या गेल्या आणि अभिजात वळणदार जरतारी सुरेलपणा गेला 

त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक 









Sunday, August 29, 2021

मितभाषी श्रीधर तिळवे नाईक 

जयंत पवार गेला अत्यंत कमी पण नेहमी खरं बोलणारा मितभाषी आणि सोशिक जयंत गेला आमच्या शेवटच्या भेटीत आम्ही फक्त एकमेकांच्या आजारावर बोललो होतो आणि हम होंगे कामयाब ची हिडन धून आळवत वेगळे झालो होतो 

जयंत लालबाग परळच्या मिल कामगारांच्यात जन्मला वाढला साहजिकच त्याची मानसिकता पूर्ण अरबन कधीच झाली नाही मी ह्या ठिकाणी काही महिने राहिलो होतो त्यामुळे एकंदर जयंत काय वातावरणात वाढला असेल ह्याचा मला अंदाज होता  त्याने मुंबई डोक्यावर ठेवली पण लालबाग परळ काळजात ! सुरवातीला चौथ्या नवतेच्या पूर्ण विरोधात आणि नंतर बाजूने असा आमचा नातेप्रवास होता 

त्याचे पहिले नाटक फुल मेलोड्रॅमॅटिक पण दुसरे अंधांतर त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा तुकडा सादर करणारे जणू वास्तवाची एक स्लाइस कापून रंगमंचावर ठेवलेली ! त्याच्या एकांकिकाही अशाच ! 

त्याला सिनेसृष्टीत लेखक दिग्दर्शक व्हायचे होते पण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ! त्यातील सिनेलेखक तो झाला ब्रेकिंग न्यूज ह्या फिल्ममुळे पण बॉलिवूडमधील सारा खेळ हिट फ्लॉपचा फिल्म फ्लॉप झाली आणि रोध निर्माण झाला सज्जनता ही बॉलिवूडमध्ये डीसक्वालिफिकेशन आहे ह्याविषयी आमच्यात सहमती होती 

त्याचे कथालेखन हे मराठीत फार महत्वाचे ! खरेतर मी त्यावर सविस्तर लिहिणार होतो किंबहुना ऐंशोत्तरी  पिढीचे कथालेखन हा एक प्रबंधाचा विषय आहे असं माझं मत आहे कथालेखनाची एव्हढी विविधता दाखवणारी पिढी ही फक्त गाडगीळ माडगूळकर प्रभाकर पाध्ये गोखले ह्यांच्या काळात होती जयंत हा आमच्या पिढीचा एक बिनीचा कथालेखक होता सुदैवाने साहित्य अकादमी मिळाल्याने त्याची दखलही घेतली गेली 

आणि आता तो गेला तो एक हरणारी लढाई लढतोय असं वाटत होतं . शेवटी हरला !

कमी शब्दात अस्तित्व दरवळत ठेवणारा एक मोठा लेखक गेला . अलविदा दोस्त !

श्रीधर तिळवे नाईक 

गतवर्षाचा धडा श्रीधर तिळवे नाईक 

एप्रिल २०२० ते मे २०२१ हा कालखंड कलात्मक पातळीवर फार विचित्र गेला १ कोव्हीड २ विषघटना आणि ३ आईचा मृत्यू अशा लागोपाठच्या घटनांनी वर्ष वेगवान केले आणि कवितेत त्यांची अभिव्यक्तीही झाली कवितेत वर्तमान ओतण्याची माझी कलाशैली आहे त्यातून कोव्हीडवर महाकाव्य विषघटनेवर बृहदकाव्य आणि आईच्या मृत्यूवर खंडकाव्य अशी तीन काव्ये झाली ह्यापूर्वी एकाच वर्षात तीन प्रकारची मोठी काव्ये कधी झाली न्हवती ती ह्यावर्षी झाली 

विचित्र गोष्ट अशी कि ह्या वर्तमानकालीन कविता फेसबुकवर टाकत असतांना डेकॅथलॉन एल्सट्रातल्या १९८३ -१९८७ ह्या दरम्यानच्या कविता मी टाकत होतो तर त्या काहींना आत्ताच्या काळाला रिलेव्हन्ट वाटायला लागल्या वास्तविक राजीव गांधींचा कालखंड आणि मोदींचा कालखंड ह्यांच्यात फरक आहे हा फरक टिपणाऱ्या राजकीय कविता फारश्या लिहिल्या जात नाहीयेत लोक अजूनही आधुनिक किंवा साठोत्तरी कवींच्या संवेदनशीलतेनं हा कालखंड बघतायत त्यातूनच जुन्या कविता वर्तमानकालीन वाटतायत राजीव गांधी आणि नरसिंहराव ह्यांनी ज्या कार्पोरेट जगताला वसवायला सुरवात केलीये ते मोदींनी पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेलं आहे अगदी भाजपसारखा राजकीय पक्ष ही कार्पोरेट म्हणून सेटल झालाय भाजप हे कार्पोरेट प्लेयर म्हणून पोलिटिकल फ़ंक्शनिंग करतंय त्याच्या सत्ताकारणाचे अनेक लोचे आहेत आपण आता ते पकडतो आहोत का ? आमच्या पिढीची संवेदनशीलता आता पुरेशी नाहीये आणि साठोत्तरी संवेदनशीलता तर पूर्ण आऊटडेटेड आहे शारीरिक तारुण्यता जर जीर्ण वृद्ध संवेदनशीलतेनं काम करणार असेल तर तिला दाद काय देणार ? जगभर देशीवाद आणि उत्तराधुनिकवाद सर्वच वर्तमानाला जखडून टाकतो आहे मराठी कला ह्याला अपवाद नाहीत खरेतर सार्वजनिक जीवनात धर्माचा वाढलेला हस्तक्षेप हा नेमका कशाचा द्योतक आहे ? आधुनिक शासनयंत्रणेचं डेड फ़ंक्शनिंग ह्याला जबाबदार आहे उत्तराधुनिक शासनयंत्रणा तर मुलखाच्या वाचाळ निघाल्या आहेत घटलेल्या कार्यक्षमता नीट ऍक्टिव्हेट करण्याऐवजी कार्पोरेट जगताने धार्मिक राजवटी स्पॉन्सर करण्याचा जो मूर्ख उत्तराधुनिक खेळ रचला त्याने सर्वत्र हा अनाचाराचा हाहाकार माजवला आहे तालिबान ह्या हाहाकाराचे एक मूर्ख स्वरूप आहे ते राज्य करता न आल्याने कोसळेलंच पण अफगाण जनतेची त्यात आणखी वीस वर्षे वाया जातील ह्याचं वाईट वाटतं धार्मिक राजवटींनी कितीही आव आणला तरी त्यांना नवीन जगतासाठी आवश्यक शासनयंत्रणा उभा करता येणं शक्य नाही त्यांना एकतर आपलं तत्वज्ञान त्यागावं लागेल किंवा स्वतःच्या कर्माने नष्ट व्हावे लागेल शेवटी लोक एक आल्टरनेटिव्ह म्हणून त्यांच्याकडे बघतायत तो नीट फंक्शन झाला तर लोक हा पर्याय टिकवतील नाहीतर फेकतील औरंगजेबाची राजवट अशीच आतल्या फोफशेपणामुळं कोसळली होती मराठ्यांनी फक्त तिला ठोसे मारणे पुरेसं ठरलं 

कॅव्हिडनं आपल्या सर्वच शासनयंत्रणा ह्यात युरोपियन अमेरिकन शासनयंत्रणाही आल्या उघड्या पाडल्या प्रश्न त्या बदलायच्या कशा हा आहे 

पर्यावरणीय हाराकिरी ह्या वर्षी केंद्रस्थानी आली खरी पण ती फक्त चर्चेत राहिली 

 पैसा बिनडोक असतो त्याला नजीकचे स्वार्थ दिसतात पण भविष्यातले विनाश दिसत नाहीत मानवी जीवन पैशाच्या हाती सोपवणे ही आत्महत्या होती आणि ही आत्महत्या पूर्णत्वास पोहचली आहे . प्रश्न आहे अर्थधनशैली हा मानवी जीवनशैलीचा मुख्य आधार म्हणून फेल गेली असेल तर पर्याय काय ?


श्रीधर तिळवे नाईक 









Saturday, July 24, 2021

 सतीश काळसेकर मार्क्सवादाची पॅशन गेली 

महेश म्हात्रे ह्या परममित्राच्या लेखनानं कळलं कि सतीश काळसेकर गेले हल्ली कवी गेले कि हवा जडच होते पण काळसेकरांच्या मृत्यूने श्वासही जड झाला 

मुंबईला जे एस हॉल (हॉस्टेल ) ला आल्यावर साठोत्तरीपैकी ज्यांची पहिली भेट झाली त्यात काळसेकर फर्स्ट ! कदाचित त्या काळात ज्यांच्याशी माझा इमोशनल बॉण्ड निर्माण झाला अशा दोघांपैकी एक (दुसरे केशव मेश्राम ) गावातून मुंबईत आलेल्या प्रत्येक कवीसाठी काळसेकर थोरल्या भावासारखे असत डोळ्यातल्या डोळ्यात हसत ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यात तर्क आणि काळजी दोन्ही असायची त्यांचं सावळं आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत इम्प्रेशनचं दही जमवायचं 

त्यांची माझी पहिली भेट पीपल्स बुक हाऊसमध्ये झाली दुकानदाराचा मुलगा असल्याने मला पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करायला आजही आवडतं त्यावेळीही आवडे माहीत नाही कशी पण पॉप्युलरनं माझा पहिला संग्रह स्वीकारला आहे ह्याची न्यूज त्यांच्याकडे होती पहिल्याच भेटीनंतर त्यांनी मला " बुद्धिमान आहेस पण भोळसट आहेस तेव्हा ह्या शहरात सावध रहा " अशी वॉर्निंग दिली होती 

पुढे ऋत्विज हा माझा मित्र आशुतोष आपटे ह्याचा मित्र असल्याने भेटायला आला तेव्हा मला माहीतच न्हवतं कि तो काळसेकरांचा मुलगा आहे ऋत्विज आमच्या हॉस्टेल ग्रुपमध्ये लगेच विरघळला मी मंगेश बनसोड आल्हाद भावसार महेश म्हात्रे राजेश बेहरे के श्यामसुंदर अशी एक हॉस्टेल टोळी बनत गेली आणि वाढतही गेली पुढे पोस्टर पोएट्रीचा उपक्रम राबवतांना मी त्यांची मला अतिशय आवडलेली पुस्तकांच्या संग्रहाविषयी ही कविता पोस्टर साठी घेतली ही कविता म्हणजे प्रत्येक पुस्तकप्रेमींची सॉलिलुकी होती आणि आम्हा सर्वांनाच ती आवडली होती आम्ही इथूनच चौथ्या नवतेचे रणशिंग फुंकले आणि ते साठोत्तरीविरुद्ध असूनही साठोत्तरीपैकी काहींनी त्याला पाठिंबा दिला सतीश काळसेकर पाठिंबा देणाऱ्यांपैकी होते काळसेकर फक्त पाठिंबा देऊन थांबले नाहीत त्यांनी नवीन पोरांच्या कविता ऐका म्हणून एक काव्यवाचनाचा प्रोग्रॅमही पीपल्सला ठेवला त्यात मी , ज्ञानदा व इतरांनी  कविता वाचल्या पुढे ह्यातूनच लोकवाङ्मयने काढलेली आठ कवींची काव्यसंग्रह मालिका फळाला आली माझा काव्यसंग्रह पॉप्युलरने १९९२ सालीच काढला होता त्यामुळे मला ह्यात घेता येणार नाही असं काळसेकरांनी सांगितलं तेव्हा मी आनंदाने अहो हे बरोबरच आहे असं म्हणालो ह्या संग्रहांच्यावर लिहायला नंतर समीक्षक मिळेना तेव्हा काळसेकरांनी आणि आल्हाद भावसार ह्यांनी मला विनंती केली आणि मी महानगरमध्ये बहुदा लेख टाकला 

मी मार्क्सशी सहमत नसलो तरी त्याचा शत्रूही न्हवतो ह्याकाळात साहजिकच वैचारिक टकराव अटळ होते सोविएत युनिअन कोलॅप्स झाल्यानंतर जी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली होती त्याचे प्रेशर त्यांच्यावरही होते सर्वच एकनिष्ठ कॉम्रेडप्रमाणे तेही क्रांतिक्षणाची वाट पहात होते मी त्यांना सरळच म्हणायचो कि हे वाट पहाणे वांझोटे आहे ते फक्त एकदाच मला म्हणाले कि तू भेटलास कि पेसिमीझम येतो मी म्हणालो मी तुम्हाला रियालिटी दाखवतोय मार्क्सवादाला ह्या देशात भवितव्य नाही आणि असलेच तर शरद पाटील ह्यांच्यासारखं काहीतरी काम सध्याच्या काळात व्हायला हवं मार्क्स भारतीय वाटत नाही हा मार्क्सवादाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना हे पटणं शक्यच न्हवतं हळूहळू आमचे संबंध ढिले पडायला लागले एकदा तर श्रीधरनं सगळी पोरं बिघडवली म्हणाले मी रिएक्ट झालो नाही 

मग पुन्हा एकदा भेटले तेव्हा पूर्वीचाच जिव्हाळा आवाजात होता सौष्ठव का बंद केलेस वैग्रे सगळ्याच साठोत्तरीप्रमाणे त्यांचाही मी प्रिंटिंगमध्ये अधिकाधिक संग्रह काढायला हवेत  असा आग्रह होता त्याउलट मला त्यांच्या समग्र कविता एकत्र हव्या होत्या 

नंतर मग एकदा फोनवर बोलणे झाले तेव्हा दिवस काढून निवांत ये मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे म्हणाले पण मला शक्य झालं नाही 

आणि आता ते गेले 

मला खात्री आहे नव्वदोत्तर पिढीतला प्रत्येक कवी ह्या बातमीने थोडा का होईना हलला असेल आमच्या पिढीला भरभरून स्नेह आणि प्लॅटफॉर्म त्यांनी दिला मतभेदांना जागा दिली आणि नातं मोठं मानलं ते मार्क्सवादी साहित्याचा मोठाच आधार होते 

त्यांच्या कवितेवर मला जे म्हणायचं आहे ते मी टिकाहरणमध्ये म्हंटलं आहेच त्यांच्या रूपाने एका मार्क्सवादी पिढीची पॅशनच गेली म्हणायला हरकत नाही 

गुड बाय कॉम्रेड !


श्रीधर तिळवे नाईक 





Thursday, July 8, 2021

 पॅशन दाय नेम इज दिलीपकुमार श्रीधर तिळवे नाईक 

दिलीपकुमार माझ्या बालपणात मला कधीच आवडले नाहीत माझे वडील त्याचे डायहार्ड फॅन त्यामुळे लहानपणी त्याचे काही चित्रपट मला नाईलाजाने पाहायला लागत वडील दर सोमवारी मला शक्य असेल तर एक चित्रपट दाखवत आणि तो बहुतांशी इंग्लिश असे तरीही काही मॅटिनीज दिलीपकुमारचे होते पण लहानपणी मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला क्रांती पाहिला आणि मला वाटलं कि हा चांगला अभिनेता आहे मी मग दिलीपकुमार रिटेक सुरु केला आणि केदार शर्माचा जोगन पाहिला मला दिलीपकुमारचा अभिनय मोकाट आवडलेला हा पहिला चित्रपट !

ह्या वेळीच  रमेश सिप्पी सलीम जावेदचा शक्ती , यश चोप्राचा मशाल  पाहताना वाटलं कि दम आहे त्यानंतर मग बिमल रॉयचा देवदास फिरून पाहिला आणि फिरून फिरून गंगावेश तसा पाहत राहिलो हा एक अद्भुत चित्रपट होता खऱ्याअर्थाने रोमँटिक चित्रपटाचा कळस !देवदासमधली पॅशन हा एक ग्रंथाचा विषय आहे 

मात्र त्याला दिलेले वास्तववादी अभिनयाचा टॅग मला कधीच पटला नाही राज कपूर दिलीपकुमार आणि देव आनंद हे तिघेही रोमँटिक अभिनेतेच ! अगदी मुघल ए आझम मधेही दिलीपकुमार मला दिलीपकुमार विथ पॅशनच वाटला . आणि तो तसा होता म्हणूनच पृथ्वीराज कपूरच्या क्लासिकल स्कूलच्या सर्वोच्च अभिनयापुढे व मधुबालाच्या क्लासिकल सौंदर्यापुढे तोडीसतोड पॅशन घेऊन टिकला त्याउलट त्याला समांतर असलेले बलराज साहनी व मोतीलाल हे जास्त व खरे वास्तववादी होते दिलीप कुमारकडे असलेली पॅशन राज व देव दोघांच्यातही मिसिंग होती आणि तिची कसर हे लोक स्टाईलने भरून काढण्याचा हे दोघे केविलवाणा प्रयत्न करत ही पॅशन नेमकी कुठून येत होती हे कोडे खुद्द दिलीपकुमारलाही सुटले असेल कि नाही कुणास ठाऊक ?

मग पुन्हा कधीतरी गंगा जमुना (ह्यावरूनच पुढे सलीम जावेदचा दिवार आला ) पाहिला आणि मग मधुमती दोघेही अभिनयात ढग होते अंदाज न येणारे पण पाऊसगच्च  ! नया दौर , राम और श्याम , लीडर ! माझी दिलीपकुमारची यादी इथे संपते बैराग वैग्रे पाहिले पण पॅशन मिसिंग वाटली . 

१९९२ ला अडा हॉ का बा ना सु ना लिहिताना कामत्रिकोणासाठी दिलीपकुमार ,  सायरा व अस्मा हा त्रिकोण निवडला आणि डोकं गरगरवणारे अनेक तपशील उपलब्ध झाले मग मी दिलीपकुमार एक व्यक्ती म्हणून विचार करणे सोडून दिले जो माणूस आपल्या मित्राच्या बायकोशी रोमान्स करतो आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडतो त्याला माझ्या एथिक्समध्ये जागा नाही साहजिकच व्यक्ती म्हणून दिलीपकुमारला जागा मिळणे बंद झाले मात्र एक अभिनेता म्हणून असलेला त्यांच्याविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही पॅशनेट ऍक्टिंग कशी करायची ह्याची दिलीपकुमार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ होते दुर्देवाने ह्या विद्यापीठाचे धर्मेंद्र , राजेंद्रकुमार , मनोजकुमार असे अनेक विद्यार्थी सुपरस्टार झाले तरी दिलीपकुमारची पॅशन ह्या सर्वांच्यात मिसिंग होती आणि नकलेत ती मग कितीही चांगली असो पॅशन ओतता येत नाही हे सिद्ध झाले सुदैवाने ह्यापैकी धर्मेंद्रने आपली अभिनयशैली बदलून हीमॅन केली आणि तो वाचला नाहीतर राजेंद्रकुमारसारखा तोही अशोभनीय झाला असता 

पुढे ह्या विद्यापीठाला समांतर रोमँटिक विद्यापीठ राजेश खन्नाने उभे केले आणि दिलीपकुमार स्कूल काही काळ मागे पडले पण पुढे अभिताभ बच्चनच्या रूपाने दिलीपकुमार विथ पॅशन विद्यापीठ पुन्हा नूतनीकरणासकट उगवले आणि त्याने दिलीपकुमारची दुसरी इनिंग प्रमोट केली पुढे शाहरुख खानने दिलीपकुमार विथ राजेश खन्ना ह्यांचा समतोल साधून ऍक्टिंगमधला तिसरा रोमँटिसिझम आणला जो आजच्या पिढीत रणवीरसिंग पुढे न्हेतोय 

माझा ना अल्ल्हाहवर  विश्वास आहे ना जन्नतवर ! त्यामुळे अलविदा ऍक्टर ऑफ पॅशन ! जहाँ रहो पॅशनमे रहो ! 

श्रीधर तिळवे नाईक 



Friday, June 4, 2021

 माझी पर्सनल होमिओपॅथी गेली श्रीधर तिळवे नाईक 

मिलिंद पोतदार ह्या माझ्या जिवलग मित्रांच्यापैकी एक ! त्याने माझ्या आयुष्यात अनेक गोष्टीबाबत कि रोल पार पाडला . कोल्हापुरात त्याच्या जेव्हढ्या ओळखी होत्या तेव्हढ्या क्वचित कुणाच्या असतील एक दिवस त्यानेच त्याला माहित असलेल्या एका डॉक्टर विषयी बोलायला सुरवात केली डॉक्टरचे नाव होते डॉ अविनाश देसाई ! मिलिन्दनेच आमची मिटिंग घडवली . त्यांचा दवाखाना हुतात्मा पार्कच्या उजव्या साईडला उद्यमनगरात होता मी गेलो तेव्हाही पेशन्ट होते 

माझी वेळ येताच  मी डॉक्टरांना भेटलो . पाऊणे सहा फूट उंची सावळा रंग डोक्याचे केस थोडे उडालेले , धारदार नाक असलेले व्यक्तिमत्व पण एकदम साधे आपण डॉक्टर असल्याचा कसलाही आव नाही . एक भविष्यातज्ञ आणि एक डॉक्टर ह्यांची ही भेट होती आणि आश्चर्यकारकरित्या त्यांना फ्यूचरॉलॉजीविषयी माहिती होती मी माझ्या आजोबांच्याप्रमाणे कुंडली किंवा हात फक्त कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी वापरतो बाकी सगळा अध्यात्मिक कारभार हे मी त्यांना पहिल्या भेटीतच सांगून टाकले मात्र हे जमले नाही तर फ्यूचरॉलॉजीच्या सर्व तंत्रांना वापरतो हेही बोलून गेलो त्यांनीही डॉक्टरांसाठी अंतःप्रेरणा फार महत्वाची असते असं सांगितलं पुढे मग होमिओपॅथी आणि फ्यूचरॉलॉजी ह्यावर जुजबी चर्चा झाली मी उठलो मात्र आम्हा दोघांच्यात पहिल्याच भेटीत बॉण्ड तयार झाला 

मी जिच्यासाठी भेटलो होतो त्या माझ्या बहिणीचे (उजूचे )प्रॉब्लेम त्यांनी अक्षरश : महिनाभरात सोडवले पुढेही माझ्या घरातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले ते उपचारांच्या इंटिग्रेटेड असण्यावर विश्वास ठेवणारे होते आणि त्यांची बायको आयुर्वेद कॉलेजात गोल्ड मेडलिस्ट होती साहजिकच कधीकधी आयुर्वेदाचा वापरही ते करत त्यांचे काही ऍलोपॅथिक डॉक्टर चांगले मित्र होते आणि ऍलोपॅथिक ट्रीटमेंट गरजेची असली कि ते त्यांच्याकडे पाठवत तर ऍलोपॅथीला ठीक करायला न जमलेले काही पेशंट त्यांनी होमिओपॅथीद्वारा ठीक केले होते होमिओपॅथी तळव्यातल्या वाहीन्यांच्यावर उत्कृष्ट उपचार करते हे मी त्यांच्याकडे अनेकदा साक्षात पाहिले स्त्रियांच्या एमसी नीट करण्यात तर ते मास्टर होते मात्र ताप वैग्रे आला कि ते स्वतःच क्रोसीन घ्या म्हणायचे आमच्या उपचारांनी ताप लगेच बरा होत नाही असे ते स्वतःच म्हणत मात्र दीर्घकाळ सर्दी किंवा कायमस्वरूपी सर्दी किंवा सायनसचा आजार बरा करण्यात त्यांना महारत होती डॉक्टरांनी कधीही पैश्याचा पाठलाग केला नाही एकतर ते श्रीमंत घरातून आले होते आणि आतून ते कुठेतरी कलन्दर होते त्यामुळेच एखाद्या पेशन्टकडे पैसे नसले तरी ते उपचार करत पैसे दुय्यम असल्याने त्यांनी कधीही आपला कट ठेवला नाही त्यांची प्रॅक्टिस ही एक शुद्ध प्रॅक्टिस होती त्यांच्याकडे स्वतःचे आजार बरे करू न शकलेल्या काही ऍलोपॅथिक डॉक्टरांचीही उठबस असे पण त्यांनाही ते फार चार्ज करत नसत 

माझ्यामुळे पुढे मिलिंद गुर्जर व मग नंतर अशी एक चेन जी मिलिंद पोतदारमुळे सुरु झाली होती त्यांच्याकडे कार्यान्वित झाली आमच्यातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले माझ्या कवितेवर त्यांचे प्रेम होते आणि माझी एक कविता त्यांनी काहीकाळ आपल्या क्लिनिकच्या भिंतीवर लावली होती

देसाईंचं होमिओपॅथीवर निष्ठावान प्रेम होतं आणि तिच्यातल्या अद्ययावत अपडेट्स ते ठेवत तिच्या एलिमेंट थेरीविषयी त्यांची स्वतःची मते होती माझी मुंबईतील एक डॉक्टर मैत्रीण प्रफुल्ल विजयकरांनी मांडलेल्या नव्या सिद्धांताचा त्यावेळी हिरिरीने पुरस्कार करी डॉक्टर त्या सिद्धांतांना काही बाबतीत सपोर्ट करत तर काहीवेळा विरोध मात्र युरोपात अडकून पडलेल्या होमिओपॅथीला  विजयकरांनी दिलेल्या भारतीयत्वावर त्यांचाही विश्वास होता माझी मैत्रीण विजयकारांना क्रांतिकारी माने ते मात्र त्यांना मान्य न्हवते 

व्यक्तिगत पातळीवर त्यांना डॉक्टर असूनही आपल्या मराठा जातीचा सॉलिड अभिमान होता बायकोबाबत ते पारंपारीक होते तिला स्वतंत्र प्रॅक्टिस करायला त्यांनी अधिक वाव द्यायला होता आणि त्यावरून त्यांच्याशी माझा एकदा कडक वाद झाला होता वहिनी उत्कृष्ट डॉकटर होत्याच पण अव्वल दर्जाच्या कुक होत्या मी मुंबईतून कोल्हापुरात गेलो कि डॉक्टरांच्या घरी किमान एकदा तरी जाणे कम्पल्सरी होते आणि प्रत्येकवेळी किमान एकदा तरी डॉक्टरांच्या घरी जेवायला थांबायला लागे 

अपवादात्मकवेळा मी त्याच्या मुंबईतील पेशण्टना औषधेही पोचवत असे डॉक्टरांचे माझ्या घरावर प्रेम इतके कि कधीकधी स्वतः औषधे घेऊन स्वारी घरी येई त्यांची एक स्कुटर होती त्यावरून ते कोल्हापुरभर फिरत पुढे केवळ स्टेट्स म्हणून त्यांनी फोर व्हिलर घेतली खरी पण स्कुटर हेच त्यांचे पहिले प्रेम होते 

त्यांच्याबाबतीत माझे बरोबर न ठरावे असे प्रेडिक्शन म्हणजे तुमचा मुलगा विश्रांत परदेशात सेटल होणार खुद्द माझाही ह्यावर विश्वास न्हवता पण जे दिसले ते बोलणे भाग होते कारण विक्रांत देसाई चक्क कर्नल होता दुर्देवाने माझा फ्लॅश खरा झाला आणि डॉक्टरांची परवड सुरु झाली ते वरून कितीही कठोर वागत असले तरी मुलांबाबत ते हळवे होते म्हातारपणी तो जवळ नसणे त्यांना व्याकुळ करणारे होते . 

आमच्या दोघांच्या एकमेकांवरच्या विश्वासाची कसोटी पाहणारा प्रसंग आला तो माझ्या आईच्याबाबतीत्त ! मी मनाई करूनही उजू गावाला आईकडे रहायला गेली आणि पूर्ण वॉर्निंग देऊनही उजूने चायनीज टाईल्स केवळ छान चकाचक दिसतात म्हणून घराला घातल्या आणि मग जे अपेक्षित होते तेच घडले ह्या टाईल्स फक्त दिसायला बऱ्या पण चालायला घसरगुंडी ! आई त्या टाइल्सवरून घसरून पडली आणि पुढे गोव्यातल्या एका डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे तिच्या पायाला प्रॉब्लेम झाला मी देसाई डॉक्टरांशी बोललो डॉक्टर म्हणाले आईला कोल्हापुरात पाठव पुढचं सगळं मी बघतो आई कोल्हापूरला आली चेकप झाला आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांनी गँगरीन झाल्याचे कन्फर्म केले फक्त देसाई डॉक्टरच असे होते जे ठामपणे सांगत होते हे गँगरीन नाहीये आणि ऍलोपॅथिक डॉक्टर्स  हे गँगरीन आहे आपण पाय कापूया नाहीतर हे शरीरभर पसरेल म्हणत होते प्रश्न होता निर्णय कुणी घ्यायचा ? डॉक्टर म्हणाले राजा काढा तुमचा इंतजाम आणि बघा काय फ्लॅश येतो का ? माझ्या संपूर्ण आयुष्यात मी फ्लॅशची इतकी डेस्परेट होऊन कधीच वाट पाहिली नसेल सुदैवाने तो आला आणि मी आईचं ऑपरेशन करायचं नाही असा निर्णय घेतला हा एक वादग्रस्त निर्णय होता आणि माझ्या ऍलोपॅथिक डॉक्टरमित्रांच्या मते मी आईला मृत्यूकडे ढकलत होतो माझा देसाई डॉक्टरांच्यावर व स्वतःच्या निर्णयावर विश्वास होता तर डॉक्टरांचा माझ्यावर मी आईला पुन्हा गावी न्हेले देसाईंची ट्रीटमेंट सुरु झाली आणि काही महिन्यांनी पायाचा हा भाग आपोआपच गळून पडला 

काही वर्षांपूर्वी आमच्या नात्याची परीक्षा खुद्द डॉक्टारांच्याबाबतच झाली मृत्यू समोर होता आणि ऑपेरेशन यशस्वी होण्याचे ५० टक्के चान्स होते साहजिकच देसाईंचा फोन आला कोल्हापुरात ये तू निर्णय घेईस्तोवर मी ऑपरेशन टेबलवर जाणार नाही मी गेलो आणि निर्णय घेतला म्हणालो ,"जावा बिनधास्त ! ओप्रेशननंतरही तुम्ही काही वर्षे जगणार"

डॉक्टर ७५ वर्षे जगले 

माझ्या ह्या डॉक्टर कम मित्राला माझी आदरांजली 

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है 

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा ( इक्बाल )


डॉक्टर अविनाश आनंदराव देसाई होमिओपॅथीतील नर्गिस होते 

.

श्रीधर तिळवे नाईक 








Sunday, January 26, 2020

मी आयुष्यात जी काही पथ्ये पाळतो त्यातील एक म्हणजे ज्या विषयावर काम करायचं ठरवलंय त्यावर काम करणे वर्तमान काळ कायमच तुमचे प्रोजेक्ट डिस्टर्ब् करत असतो अशावेळी अजिबात विचलित न होता आपल्या प्रोजेक्टवर काम करणे हे मला आवश्यक वाटतं कोल्हापुरात असतांना वैचारिक पातळीवर बाबासाहेब आंबेडकर गांधी आणि मार्क्स ह्यांच्यावर मला लिखाण करणे आवश्यक वाटले ते मी केलं (त्यातूनच परिवर्तनवाद का कोसळला चा प्रपंच झाला ) ह्या काळातील माझा लेखनप्रपंच हा प्रामुख्याने कविता कथा आणि नाटक ह्यांच्यावर केंद्रित होता कोल्हापूर शहर एक्स्प्लोर करणे हे काम मी नेटाने केले स्थानिक संस्कृती ही ह्या काळात मला महत्वाची वाटत होती आणि तिच्यावर पडणारे मार्गी ताणही !

१९८८ ते १९९५ हा काळ मी जरी चौथ्या नवतेची चळवळ चालवत होतो तरी नाटकात पीएचडी करत होतो ह्या काळात मी जे लिहिले त्याचीच व्याख्याने सद्या मुंबई विद्यापीठात देतो सगळी चिन्हकी व सगळे इजम पूर्वी माहित असले तरी ह्या काळात ते अकादमिकली कोळून प्यायलो ह्याच काळात अडा हॉ का बा ना सु ना लिहिली कारण फावला वेळ मुबलक होता चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या मुंबईत दाखल झालेला आउटसायडर चमकत राहिला

बांधकाम चालू आहे वर १९९६ ला केस झाली आणि आयुष्य बदलले धर्म नावाची आणखी एक महाकादंबरी लिहिली चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व कविता कंटिन्यू राहिल्या २००२ नंतर अर्थ ही महाकादंबरी लिहायला घेतली जेएनयू मध्ये व्याख्यान दिले आणि त्याचा विस्तार म्हणून २००५ ते २०१० हा कालखंड मी इतिहासाला दिला चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या

जोशी कि कांबळे ही फिल्म माझ्या आयुष्यातील आणखी एक टर्निंग पॉईंट तिच्यामुळे फिल्म इंडस्ट्री फुल्ल टाइम झाली नेट सिरीजमधल्या कविता ह्या बदलामुळे सुरु झाल्या नाटक आणि फिल्म्स ह्यांची संख्या वाढली ह्या काळात हातात घेतलेली मोक्ष ही कादंबरी काही पूर्ण झाली नाही राहुल सरवटे विदेशात गेल्याने पुढे फेसबुक आल्याने व इतर काही कारणांनीं सौष्ठव बंद केले

२००४ नंतर पुन्हा आयुष्याने पलटी मारली अपघात झाला हल्ले झाले शारीरिक फिटनेसची वाट लागली कवितांची निर्वाण सिरीज इथूनच सुरु झाली फेसबुकवर प्रचंड ऍक्टिव्ह झालो कारण शारीरिक लांब पल्ल्याच्या हालचालींना आलेली मर्यादा मोक्ष कादंबरी लिहायला पुन्हा घेतली पण पूर्ण होईना नाटकांवरच्या व्याख्यानांचा परिणाम म्हणून नवी नाटके लिहिली मुख्य लक्ष अध्यात्मिक लिखाणाकडे लागले मोदींच्यामुळे इतिहासातील हिंदुत्व पुन्हा न्याहाळणे सुरु झाले काही भागांचे मराठी भाषांतर केले क्वचित समकालीन आयाम दिला

यांतल्या प्रत्येक कालखंडात ज्यावर फोकस आहे त्यावरच लिखाण केले वर्तमानाला प्रतिक्रिया कवितेतून येतातच वेगळी गद्य प्रतिक्रिया प्रत्येकवेळी का द्यावी ? ह्यापुढे माझे सर्व लक्ष्य हे मोक्षिक लिखाणावर केंद्रित असणार आहे त्यामुळे कधी न्हवे ते माझ्या कवितांचा वेग आता मंदावलाय जगाचा प्रपंच सांभाळायला नितीन वाघ स्वप्नील शेळके प्रणव सखदेव पासून ह्रिषीकेश गुप्तेपर्यंत अनेक नवे लेखक समर्थ असतांना आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचे आता काय काम असाही एक विचार आहेच



Friday, December 27, 2019

तुमने अच्छा लिखा था ग़ालिब मगर
तुम्हारे मरनेके बाद वो अच्छा लगा
श्रीधर तिलवे नाईक 

Friday, March 1, 2019

किशोरला मी डाय हार्ड रोमँटिक कवी म्हणून ओळखतो आम्ही चौघांच्या कविता नावाचा प्रोग्राम एकत्र करायला लागलो तेव्हा किशोर रोमँटिक दासू आधुनिक प्रकाश होळकर देशी आणि मी चौथी नवता अशा मराठीतील चारी महत्वाच्या नवता आम्ही सादर करत असू आम्हा चौघांचेही हे पिंड होते आणि एकमेकांच्या पिंडांना आदर व सन्मान देत आम्ही हा कार्यक्रम सादर करत असू स्वतःच्या भावनांच्यात ठाय मांडून बसलेल्या किशोर कदमांच्या कविता आणि स्वतः किशोर ह्यांच्यात द्वैत नाही अत्यंत हळवा आणि ओव्हरसेन्सिटिव्ह असणारा माझा हा मित्र तशाच कविता लिहितो आणि प्रामाणिकपणे लिहितो पण अलीकडे झालेला महत्वाचा बदल म्हणजे तो अलीकडे टाळ्यांची अपेक्षा करत नाही तो स्वतःसाठी लिहितो दुसरा बदल म्हणजे अलीकडे त्याने फक्त स्वतःत ठाय मांडणे सोडले आहे तो भवतालच्या अवकाशाविषयी सचेत झाला आहे तो व्यक्ती म्हणूनही सचेत होताच पण आता त्याच्या कवितेत हे आढळते आहे आणि हा बदल उत्तम आहे 

Wednesday, February 27, 2019

माझ्या वैचारिक लिखाणाबाबत आत्ताचा श्रीधर तिळवे काय विचार करतोय असा प्रश्न सारखा येतोय एका अर्थानं तो जिवन्त नाहीये शरीर आहे हे शरीर जे लिहितंय ते अध्यात्मिक आहे मी ते येऊ देतो 

Tuesday, February 26, 2019

मी युद्धाचा कट्टर विरोधक असलो तरी जर समोरचा प्रचंड हिंसक असेल तर
१ सुरक्षणासाठी केलेले संरक्षण
२ आक्रमण झाल्यावर अधिक आक्रमण होऊ नये म्हणून दक्षतेसाठी केलेले अधिकचे आक्रमण
हे नैतिक मानतो
भारतीय सेनेचे म्हणूनच अभिनंदन 

Thursday, February 21, 2019

नामवरसिंह गेले . मराठीत बेडेकर आणि हिंदीत नामवर हे दोन मार्क्सवादी समीक्षक असे होते ज्यांच्याबद्दल भय , आदर आणि हे काय म्हणतात/ किंवा म्हणून गेलेत म्हणून  उत्सुकता असायची /होती बेडेकर आधीच्या पिढीचे असल्याने फार आधी गेले(१९७३)  खुद्द मार्क्सवाद्यांनीच त्यांची पत्रास फारशी ठेवली नाही मग नॉन मार्क्सवादी काय पत्रास ठेवणार त्यामुळं त्यांचा मार्क्सवादी वारसा कोणी मराठीत नीट चालवला नाही अपवाद कदाचित शरद नावरे असावेत पण त्यांनी चौफेर लिखाण न केल्याने ते कोल्हापूरच्या वर्तुळापुरते सीमित आहेत शिरवाडकर वैग्रे ठीकठाक त्यामुळे मार्क्सवाद्यांचा साहित्यातला आवाज ऐकायला नामवारांच्याशिवाय पर्याय राहिला नाही

नामवरांच्या सुदैवाने  त्यांच्यावेळी  नेमका गजानन माधव मुक्तिबोध हा अद्भुत प्रतिभाशाली कवी चक्क मार्क्सवादी होता आणि त्याच्यामुळे हिंदीतला देशीवाद अधिक सशक्तपणे व काहीसा बिनधास्तपणे डावा झाला मराठीतला डावेपणा मात्र कायमच काँग्रेसवादी(गांधीवादी ) आणि आंबेडकरवादी परिघाच्या आत घुटमळत राहिला त्यामुळे नारायण सुर्वेंच्या नंतर मराठीत सशक्त डावी कविता झाली नाही अपवाद माझा मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी सुहास एकसंबेकर किरण खेबुडकर गणेश विसपुते व अर्थात सतीश काळसेकर त्याउलट डाव्या आंबेडकरवादाने नामदेव ढसाळसारखा अभूतपूर्व कवी जन्माला घातल्याने आणि त्याला पूरक केशव मेश्राम , यशवंत मनोहर , प्रकाश जाधव त्र्यंबक सपकाळे अरुण काळे महेंद्र भवरे भुजंग मेश्राम असे एकापेक्षा एक कवी निर्माण झाल्याने आणि पुढे दया पवारांच्या दलित आत्मकथनाने सारे वळणच बदलल्याने मराठी डावेपणा हा हळूहळू आंबेडकरवादीच झाला  ह्यात भर पडली ती शरद पाटलांच्या माफुआवादाने ! मार्क्स फुले आंबेडकर ह्यांना एकत्र कसे घेऊन जायचे ह्याचे उत्कृष्ट मॉडेलच शरद पाटलांनी सादर केल्याने मराठीत शुद्ध मार्क्सवाद्यांची गरजच सम्पली . पुढे कांचा  इल्लय्याने मार्क्स आणि आंबेडकर ह्यांना एकत्र न्हेण्याची गरज मांडली तेव्हा ती नॉनमराठी लोकांना थोर वाटली तरी मराठी लोकांना ती शरद पाटलांच्यामुळे आधीच माहिती होती हिंदीत मात्र आंबेडकरवादाचा प्रभाव फार उशिरा पडायला लागल्याने तिथली साठोत्तरी डावी कविता अधिक सशक्त निपजली आणि नामवरांनी तिला आवश्यक असलेली समीक्षिय बॅकग्राउंड व्यवस्थित पुरवली डिकलोनायझेशनचे मार्क्सवादी आर्थिक विश्लेषण त्यांना उत्कृष्ट जमले पण त्यांच्या परखडपणामुळे आणि ते ज्या जेएनयू त शिकवत होते त्याच्या डाव्या वर्तुळामुळे त्यांना हळूहळू मठाधीशाचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस त्यांच्यामागे उभी राहिली कारण शेवटी ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होती आणि डाव्याना उत्तेजन देण्याची आणि त्याचबरोबर मॅनेजही करण्याची ती उत्कृष्ट सोय होती

गजानन माधव मुक्तिबोधांना हिंदी कवितेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा प्रचंड वाटा होता आणि निर्मल वर्माच्या कथेलाही त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आपल्याकडे विंदा करंदीकर हे डावे पण प्रभावी कवी होते पण नेहरूंचे मॉडेल प्रमोट करणारे असल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला त्यातच सुर्वे चांगले कवी असले तरी त्यांच्याकडे गजानन मुक्तिबोधांच्या टोलेजन्ग प्रतिभेची वानवा होती त्यामुळे मराठीत नामवरांना कोणी समांतर समीक्षक दिसत नाही

नामवरांचा  जन्म बनारसला झाला होता आणि काशीच्या पांडित्यगिरीचे अवशेष त्यांच्यात जोरदारपणे शाबूत होते   राहुल सांकृत्यायन हे डावे ऋषी वाटायचे आणि ते डावे पंडित ! साहजिकच ते कालिदासाचा टीकाकार मल्लिनाथ आपला कुळपुरुष असल्यासारखे बोलायचे आणि शास्त्रार्थ मनापासून करायचे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तल्लख बुद्धी , धाडस , वादविवादपटुता आणि एन्सायक्लोपीडिक डाटा त्यांच्याजवळ भरपूर होता शेवटी ते हजारीप्रसाद व्दिवेदींचें शिष्य होते अमर्त्य सेनांची शब्दावली वापरायची तर आर्गुमॅन्टिव्ह इंडियन !

कविताके नये प्रतिमान (१९६८)ह्या ग्रंथाने त्यांची ही डावी पंडितीगिरी चालू झाली मूल्यकेंद्री साहित्याचा आग्रह त्यांनी जोरदारपणे लावून धरला जे जे अस्तित्वात आहे त्याची टीका झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि साहित्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य होते आणि वेळ आली तेव्हा साहित्याची स्वायत्तता त्यांनी लावून धरली  मार्क्स आणि साहित्याची स्वायत्तता ह्या दोन गोष्टी थेरॉटिकली एकत्र जात नसल्या तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी कलेची स्वायत्तता आवश्यक असल्याने तिचा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय राहात नाही असे मला वाटते हे तसेच आहे जसे मुस्लिम एखाद्या  राष्ट्रात अल्पसंख्याक असले कि सेक्युलर असतात . त्यामुळे मार्क्सवाद्यांना समजली नाही तरी मी नामवरांची अडचण ओळखून होतो

मी कोल्हापुरात असतांना त्यांच्या समीक्षिय विधानांना कधी निरमा कधी निर्मला (हा कोल्हापूरचा वॊशिंग पॉवडरचा स्थानिक ब्रँड होता जिथे मी बालपणी प्लास्टिक पॅकिंग शिकलो होतो  ) म्हणायचो माझा मित्र राजकुमार यादव हा हिंदीचा विद्यार्थी असल्याने आमच्यात नामवरांना धरून काही वादही होत त्यांचे चांगले विधान असले कि निरमा व खराब विधान असले कि निर्मला असे आमचे चाले नामवरांनी दोन्ही प्रकारची विधाने करत स्वतःकडे लक्ष्य राहील ह्याची काळजी घेतली

दुसरी परंपराकी खोज नंतर नामवरांनी लिखित असं काही काम केलं नाही बहुधा ओरलचा शोध घेता घेता तेच ओरलच्या इतक्या प्रेमात पडले कि त्यांनी लिखिताकडे पाठ फिरवली बहुतांशी पंडित भारतात  शेवटी व्याख्याते होतात त्यांचेही असेच काहीतरी झाले असावे .

कम्म्युनिस्ट असल्याची किंमत त्यांनी आयुष्यभर चुकवली प्राध्यापकीय दोन जॉब त्यांना सोडावे लागले (एकदा बनारस तर एकदा सागर ) सीपीआय च्या जनयुगाचे ते काही काळ संपादकही होते आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे एक निवडणूक लढून ते हरले होते टेन्शनला नव्या कवितेचे प्रमुख लक्षण मानणारी त्यांची समीक्षा स्वतःच्या जीवनातही नानाविध टेन्शनस  पाळून होती बहुदा त्यांनीच संरचनावाद साहित्याच्या अभ्यासक्रमात प्रथम आणला


मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या वैचारिकतेत अनलिमिटेड हृदय नाही आणि आत्मा तर बिलकुलच नाही परिणामी एक रुक्ष पण शास्त्र व शस्त्र हातात धरणारी IDEOLOGY असे त्याचे स्वरूप राहते
आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारून त्याला अनलिमिटेड हृदय देण्याचा प्रयत्न केला अनेक मार्क्सवाद्यांना आजही हे कळलेलं नाही नामवरांची गोची हीच होती कि संवेदनशीलतेमुळे त्यांच्याकडे हृदय होते आणि मार्क्सवादाच्या चौकटीत ह्या हृदयाचे काय करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही मला वाटते ही केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्या अख्ख्या पिढीचीच शोकांतिका आहे

नामवरांच्या बरोबर ही पिढीही गेली . नामवरांचे जाणे हा त्या पिढीचा अस्त आहे .
त्यांच्या स्मृतीला माझा सलाम !

श्रीधर तिळवे नाईक